शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

वसई नंतर आता ‘मिशन केळवे संवर्धन’

By admin | Updated: January 11, 2017 05:56 IST

वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर जिल्ह्यात मराठ्यांचे उत्सव सर्वत्र सुरु झाल्यानंतर आपल्या गड किल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य

पालघर: वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर जिल्ह्यात मराठ्यांचे उत्सव सर्वत्र सुरु झाल्यानंतर आपल्या गड किल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य ‘किल्ले वसई मोहीम’ मागील तेरा वर्षा पासून करीत आहे. आज केळवे संवर्धन मोहिमेचे योगेश पालेकर यांच्या हस्ते केळवे येथे पारंपरिक वेशभूषेत विजय दिन साजरा करण्यात आला.सन १७३९ मध्ये वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यासह परिसरातील गड किल्ल्यावर, गावागावात मराठ्यांचे मानाचे उत्सव सुरु झाले. ह्यावेळी पोर्तुगीजासह, ब्रिटिशांनी हिंदूंच्या गडकोटा वरील वास्तू, देवदेवतांची मंदिरे नष्ट केली होती, त्यांची पुर्नस्थापना करण्यात आली. व गावागावातून देवतांच्या पालखी मिरवणूका, देवीचा गोंधळ आदी उत्सव पुन्हा सुरु झाले. त्यानंतर ब्रिटिशांच्या आदेशाने मराठी सणावर बंदी आणण्यात येऊन गाडे किल्ल्यांची नासधूस करण्यात येऊ लागली. परिणामी पुन्हा पालखी मिरवणुका बंद पडण्याची अवस्था निर्माण झाल्यानंतर चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांचे जुलमी शासन पूर्ण नामशेष केले. त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचे वंशज म्हणून गडेकोटांचे संवर्धन आणि उद्वस्त होऊ पहात असलेल्या देवतांची पूजा अर्चा आणि पालख्या साजरा करण्याची जबाबदारी प्रत्येक स्थानिक हिंदू धर्मीयांवर येऊन ठेपली.‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत सन २००३ पासून प्रत्येक वर्षी गडकोटावर विजय उत्सव, संवर्धन मोहीम, पालखी उत्सव साजरा करण्याची मोहिमेला प्रारंभ झाला. ह्याच मोहिमेचा एक भाग म्हणून ह्यावर्षी पहिल्या टप्प्यात वसई किल्ला ते केळवे जंजिरा किल्ल्या दरम्यान होणाऱ्या ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ चा मान वसईतील अर्नाळा गावास मिळाला. तर आज दुसर्या टप्प्यात ह्या पालखीचा मान जेष्ठ शिवप्रेमी शेखर (मामा) फरमन, भिवंडी आणि केळव्याच्या योगेश पालेकर ह्यांना देण्यात आला होता. त्यामुळे केळवे संवर्धन मोहिमेच्या शेकडो दुर्गप्रेमींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत हातात भगवे झेंडे,ढोलताश्यांच्या गजरात केळवे गावात मिरवणूक काढली.आण िविजयदुर्ग गडावर जात विजय दिन साजरा केला.