शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पैसे घेता, मग रेतीच्या गाड्या का पकडता?, रेतीमाफियांनी पोलिसांना विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:24 IST

वसई तालुक्यातील खानिवडे उंबरपाडा रेती बंदरावर सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रक, जेसीबी वर पालघर जिल्ह्याचा पदभार स्विकारलेल्या पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी छापे मारून करोडो चा मुद्दे माल जप्त केला.

पारोळ : वसई तालुक्यातील खानिवडे उंबरपाडा रेती बंदरावर सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रक, जेसीबी वर पालघर जिल्ह्याचा पदभार स्विकारलेल्या पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी छापे मारून करोडो चा मुद्दे माल जप्त केला. या कारवाईचा रेती व्यवसायि कांनी विरोध करत रेतीच्या भरलेल्या गाड्या सोडताना बंदरात उभे राहून पैसे घेता. मग कारवाई का करता असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.विरारच्या हद्दीत चिखलडोंगरी, खार्डी, शिरगाव, वैतरणा चांदीप, उसगाव, खाणीवडे, हेदिवडे, चिमणे, नारंगी, तानसा आणि कोसिबे असे १२ रेतीबंदरे आहेत. या बंदरांवर वाळूमाफियांकडून वाळूउपसा सुरूच होता. या वाळूउपशामुळे वैतरणा आणि शिरगाव रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला आहे. वैतरणा खाडीतून वाळूउपसा करून खानिवडे ते उंबरपाडा रस्त्यावरून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरूच होती. शासकीय वाहने या रस्त्याने येऊ नयेत, यासाठी रस्त्यावर खड्डे करण्यात आले आहेत; तसेच रेतीच्या गाडीची ओळख पटू नये यासाठी गाड्यांच्या नंबर प्लेटवर चिखल, वंगण, ग्रीस लावले जाते.पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी स्वत: धाडसत्र सुरु केले असून या धाडीत या पथकाने ४३ ट्रक, १ कार, १ जेसीबी असा ४ कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर वाळूमाफियांनी सात ट्रक पळवून नेले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान वसई तालुक्यात काही महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादानेच हा कारभार चालत असल्याचे दस्तुरखुद्द वाळू काढणार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. विरार पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी बंदरात सिव्हिल ड्रेसवर गाड्या मोजण्यासाठी असतो. आणि तो पैसे जमा करतो जर पैसे घेता मग कारवाई कशाला करता असा सवाल विचारला जात आहे. जर पोलीस अधीक्षक सिंह यांना जर खरोखर हि वाळू तस्करी रोखायची असेल तर त्यांनी वसुलीबाज पोलीस कर्मचाºयांना शोधून त्यांना कंट्रोल ला जमा करावे. आणि ज्यांच्या हद्दीतून रेती काढली जाईल त्या अधिकाºयावर कारवाई करा असे सांगितले.>वाळूमाफियांचा सल्लारेती उत्खननावर बंदी असताना महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नजरेआड रेतीची चोरटी वाहतूक केली जाते. त्यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे.अधिकारी हे संपत्ती गोळा करीत आहेत. जर त्यांना शासनाने परवानगी दिल्यास तो पैसा शासनाला जाईल असा सल्ला वाळू माफिया देतात.