शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अखेर ‘ती’ कचराकुंडी हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:05 IST

स्थानिक मुजोर नगरसेवकाला मिळला धडा; वाद मिटला शांततेने, जनतेची झाली जीत

वसई : एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली हरित, स्वच्छ आणि सुंदर वसई असा नारा द्यायचा, त्यात शहरात आधीच कमी उरलेली खेळाची मैदाने आणि जी अस्तित्वात आहेत त्याच खेळांच्या मैदानात कचराकुंडी उभारून नागरिकांच्या आरोग्याशी खेळायचा महाप्रताप काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला होता.मात्र नवघर माणिकपूर विभागातील चुळणेवासियांच्या प्रचंड विरोधामुळे व आंदोलनाचा इशारा दिल्यावर अखेर आयुक्तांनी ही वादग्रस्त आणि डोकेदुखी ठरलेली खेळाच्या मैदानातील सिमेंटची कचराकुंडी शुक्रवारी संध्याकाळी जमीनदोस्त करून ह्या वादावर पडदा पाडला आहे.वसईच्या एच प्रभाग अंतर्गत चुळणे गावातील एकमेव अशा खेळाच्या मैदानात महापालिकेने स्थानिक नगरसेवकांच्या हट्टामुळे सिमेंटची कचराकुंडी बांधण्यात आली होती. त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांना व त्या ठिकाणी होणाºया विविध कार्यक्रासाठी येणाºया नागरिकांची दुर्गंधी मुळे मोठी गैरसोय व्हायची.पहिल्या पासूनच ग्रामस्थ या कचराकुंडीच्या विरोधात होते, याबाबत अनेकदा त्यांनी ही कचराकुंडी हलविण्यांत यावी यासाठी स्थानिक नगरसेवक फ्रँक आपटे यांना विनंती केली. मात्र ही कचराकुंडी इथेच राहणार, किंबहुना कोण ही हलवते ते बघतो असा दम देऊन हा प्रश्न तीन महिन्यापासून टोलवत ठेवला, स्थानिक नगरसेवकांच्या हटवादी धोरणामुळे याठिकाणी जागृती संस्थेच्या जॅक गोम्स यांनी आपल्या शिष्टमंडळा तर्फे १४ आॅगस्ट रोजी महापालिका आयुक्तां ची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, प्रसंगी त्यांना घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे हे सुद्धा दाखवले, त्याचवेळी आयुक्त सतीश लोखंडे यांनी आपल्या आरोग्य खात्याचे नवघरचे जितेंद्र नाईक यांना हि कचराकुंडी हलवा असे निर्देश दिले मात्र स्वच्छता निरीक्षक नाईक यांना नगरसेवक आपटे यांनी ती हलविण्यास आडकाठी केल्याचे गोम्स यांनी सांगितले. त्यामुळे हा वाद आणखीनच पेटला दोनच दिवसापूर्वी गोम्स यांनी आयुक्तांना इशारा देऊन हि कचराकुंडी हलविण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा देताच हा वाद आणखीनच पेटू नये याकरता अखेर आयुक्तांनी हि वादग्रस्त कचराकुंडी आपल्या पथकास सांगून जमिनदोस्त केली, आणि या वादावर एकदाचा पडदा टाकला. त्यामुळे नगरसेवकाला धडा शिकवला गेला आहे.मैदानातील कचराकुंडी हलवून इतर ठिकाणी नेण्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा केला मात्र आयुक्तांनी आदेश देऊन ही नगरसेवकाने न ऐकता लोकांच्या आरोग्याशी खेळून हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनविला, याला लोकशाही म्हणत नाही, याउलट हा वाद म्हणजे नगरसेवक वरचढ महापालिका का असा झाल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.जॅक गोम्स

टॅग्स :Vasai Virarवसई विरार