शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

डहाणूत रेशनिंगचा ठणठणाट

By admin | Updated: September 7, 2015 03:45 IST

डहाणू तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या कारवीच्या झोपडीतील चूल पेटते ती रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या भरवशावर.

डहाणू : डहाणू तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या कारवीच्या झोपडीतील चूल पेटते ती रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या भरवशावर. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तांदूळ, गहू, तेल, साखर मिळाले नसल्याने येथील घरोघरी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून कुपोषणाच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. शिवाय या भागातील केशरी कार्डधारकांना गत नऊ महिन्यांपासून रेशनचे धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.ज्या बचतगटांकडे या दुकानाचे परवाने आहेत. त्यांनी धान्य व रॉकेल मिळण्यासाठी लागणारे पैसे भरल्यानंतरही हा पुरवठा होत नसल्याने त्यांनी मोर्चा काढण्याचा इशारा डहाणूच्या तहसीलदारांना यांना दिले आहे. शासनाने गेल्या सहा महिन्यापासून रेशनीगवरील धान्य कमी केल्याने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मेटाकुटीला आला आहे.विशेष म्हणजे डहाणूतील महिला बचत गट परवाने धारकांनी धान्य उचलण्यासाठी पुरवठा शाखेत जून, जुलै, आॅगस्ट असे तीन महिन्याचे पैसे भरले आहेत. परंतु बोरीवली, भिवंडीच्या एफ.सी.आय. गोडाऊन मधून डहाणूत पुरेशा प्रमाणात धान्यपुरवठा होत नसल्याने रास्तभाव दुकान चालविणारे महिला बचत गट हवालदिल झाले आहे. जर धान्य गोदामात नसेल तर पैशांचा भरणा करण्याचा अट्टाहास का असा सवाल रेशन दुकानदारांचा आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील रास्तभाव तसेच किरकोळ रॉकेल परवानेधारकांनी मोर्चा, धरणे आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे डहाणूच्या तहसीलदार प्रितीलता कौरथी यांना दिला आहे. (वार्ताहर)