शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

वसतिगृहापासून आदिवासी विद्यार्थी अद्यापही वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:41 IST

शाळा व महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले तरीही आदिवासी विद्यार्थी हे निवासी शासकीय वसतिगृहापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन प्रवेश सुरू करा अन्यथा, मी उपोषण सुरू करेन असा इशारा आमदार अमित घोडा यांनी स्व:पक्षाच्याच सरकारला दिला आहे.

डहाणू : शाळा व महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले तरीही आदिवासी विद्यार्थी हे निवासी शासकीय वसतिगृहापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन प्रवेश सुरू करा अन्यथा, मी उपोषण सुरू करेन असा इशारा आमदार अमित घोडा यांनी स्व:पक्षाच्याच सरकारला दिला आहे.डहाणूत प्रांताधिकारी नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना जातीचे दाखले अद्याप मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना आॅनलाइन प्रवेश अर्ज करता आले नाहीत. शिवाय नामांकित इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही घरी बसण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेक हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या समस्यां सोडविण्याकरिता डहाणूचा आदिवासी विकास प्रकल्प अपयशी ठरला असल्याने याबाबत आमदार अमित घोडा यांनी आवाज उठवला असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सोमवारी डहाणू येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहेयाबाबत ते म्हणाले की हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोई सुविधा असलेल्या निवासी शासकीय वस्तीगृहात अद्यापही तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही आहे त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पहाटे पासून घरातून निघून संध्याकाळी घरी यावे लागते. शिक्षण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासा ,बोर्डी, चिंचणी भागात नवीन वसतिगृह सुरु करण्याची गरज असताना मात्र गेल्या १५ वर्षांपासून एकही वसतीगृह बांधले नाही किंवा विद्यमान शासकीय वसतिगृहांची क्षमता वाढवली नाही त्यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले की, नामांकित इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणतीही पूर्व सूचना न देता २४ आॅगस्ट रोजी आदिवासी प्रकल्पाने दोन बस मधून नचिकेता हायस्कूल मधून डहाणू आणि जव्हार प्रकल्पाचे विद्यार्थी परस्पर पनवेल येथील शाळेत स्थलांतरित केले तिथे असंख्य गैरसोयी असल्याने पालकांनी आपल्या मुलांना तिथून परत आपल्या घरी आणले आहे ते आजतागायत घरीच बसले आहेत. त्यांनी आदिवासी विकास विभागावर चौफेर टीका केली ते शेवटी म्हणाले की डहाणूत ६ महिन्यापासून प्रकल्प अधिकारी , प्रांताधिकारी नाही त्यामुळे शेकडोंचे दाखले रखडले आहेत.हा तर राज्य सरकारला घरचा आहेर!निवासी वसतीगृहासाठी त्यांना अर्ज करता आले नाहीत.त्यामुळे वंचित राहिलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी पुन्हा आॅनलाइन प्रवेश प्रक्रि या सूरु करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा १५ दिवसानंतर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू.विद्यार्थी व पालक तसेच विविध आदिवासी शैक्षणिक संघटना देखील आपल्यासोबत उपोषणास बसणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी आहे त्यामुळे घोडा यांचा इशारा हा सरकारला घरचा आहेर असल्याचे मानले जाते आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार