शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

आदिवासी विद्यार्थ्याचा गेला प्रशासनाच्या बेफिकिरीने बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:42 IST

हेळसांड खपवून घेणार नाही : राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित संतप्त

जव्हार : विक्र मगड तालुक्यातील विक्र मशाह वसतिगृहात झालेल्या आदिवासी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मंगळवारी राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वसतिगृहाला भेट दिली. येथील व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि कोंडवाड्यासारखी परिस्थिती पाहून पंडित यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अनंता तुळशीराम वायड या तेरा वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी पंडित यांनी येथील बेफिकीर व्यवस्थापनावर चांगलेच ताशेरे ओढले. आदिवासी विद्यार्थ्यांची अशी हेळसांड खपवून घेणार नाही, असे सांगून तातडीने येथील सर्व विद्यार्थी जवळच्या शासकीय आश्रमशाळेत दाखल करावेत, असे आदेश यावेळी पंडित यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पंडित यांनी मयत बालकाच्या वडिलांशीही चर्चा करून आस्थेने विचारपूस केली.

जव्हार येथील अनंता वायडच्या कुटुंबाला भेट देऊन आल्यानंतर पंडित यांनी विक्रमगड तालुक्यातील विक्रमशहा वसतिगृहाला भेट दिली. त्या वसतिगृहातच तो मरण पावला होता. त्याची प्रकृती रात्री एक वाजता बिघडली होती. परंतु तिथल्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले. पहाटे तीन वाजेपर्यंत तो अत्यवस्थ झाला तेव्हा त्याला उपचारासाठी तेथून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पोहचल्यावर अवघ्या पाच मिनिटात त्या विद्यार्थ्याने प्राण सोडले. डॉकटरांचा असा अंदाज आहे की त्याला सर्प दंश झालेला असावा, पण येथील कोंडवाड्यासारखी व्यवस्था, निकृष्ट भोजन आणि आदिवासींबाबतीत येथील व्यवस्थापनाची संवेदनशून्य भूमिका या मृत्यूस कारणीभूत असल्याचे त्यांना दिसले.या वसतिगृहाचे दरवाजे मोडलेल्या अवस्थेत होते. मुली राहत असलेल्या रुम्सच्या खिडक्यांना झडपा नाहीत, स्नानगृहे, शौचालये मोडलेल्या अवस्थेत आहेत.ज्या ठिकाणी मुलांचे निवासस्थान आहे तिथे अकराशे चौरस फूट जागा आवश्यक आहे तेथे केवळ सातशे चौरस फूट जागा आहे, यामध्ये ४५ मुल खुराड्यात ठेवल्यागत राहतात, शौचालयाकडे जाणाºया रस्त्यावर लाईट्स नाहीत. जनरेटर व इनव्हर्टर बंद पडलेले आहेत. बाहेरचा व मागचा व्हरांडा गोठ्याप्रमाणे आहे. मुलांची जेवणाची व्यवस्था अतिशय घाणेरड्या पध्दतीची होती. त्या वसतिगृहात असणारे ४५ मुले व ३५ मुली शिक्षणासाठी अतिशय बिकट वातावरणात राहत आहेत. एकूण ८० आदिवासी विद्यार्थी या वसतिगृहात कोंडवाड्याप्रमाणे जीवन जगत आहेत.हे वसतिगृह चालवणारी संस्था सरकारकडून लाखोंचे अनुदान घेते ेआहे. मात्र त्या तुलनेने आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाºया सुविधा देत नाहीत हे पाहून पंडित यांनी संताप व्यक्त केला.यानंतर पंडित यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी एकही आश्रमशाळा किंवा वसतिगृहाच्या विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष चालणार नाही, असे स्पष्ट ताकीद पंडित यांनी दिली. या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.येथील शासकीय वसतिगृहाच्या बांधकामात वन विभागाच्या परवानगीच्या अडचणीबाबत तातडीने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना प्रस्ताव देण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाºयांना देऊन आपण स्वत: त्याचा पाठपुरावा करु असे पंडित यांनी सांगितले.विद्यार्थ्यांचे समायोजनअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, पालघर जिल्हा सल्लागार दामू मौळे यांनी यावेळेस वसतिगृहात राहत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना जवळील रिक्त आश्रम शाळेत समायोजित करण्यात येईल. आणि काहीच दिवसात मुलांचे समायोजन करून हे वसतिगृह बंद करण्यात यावे, यासाठी पंडित पुढील कारवाई करणार आहेत. यावेळी प्रकल्प कार्यालय, जव्हारचे आनिल सोनावणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण व परिषदेचे विक्र मगड तालुकाध्यक्ष लहू नडगे व वाडा सचिव दशरथ महाले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.