शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अखर्चिक 57 कोटींचा निधी विकासकामांवर खर्च करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:18 IST

जि.प. सर्वसाधारण सभा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्हा परिषदेचा अखर्चिक राहिलेला ५७ कोटींचा निधी कुठल्याही परिस्थितीत परत न जाता त्याचा वापर मार्चअखेर जिल्ह्यातील विकासात्मक बाबींसाठी खर्च केला जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी जि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यापुढे विभागप्रमुख किंवा अधिकारीवर्ग बैठकीत हजर राहणार नाही, अशांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या सुमारे सात कोटी ५० लाख निधीवर सत्ताधारी पक्षाने स्वतःचे वर्चस्व गाजवत अधिकाधिक निधी आपल्याकडे कसा राहील, अशा आखलेल्या डावाला विरोधी पक्षाने कडवा विरोध दर्शविला. त्यामुळे या निधीची समान विभागणी न करता पाच सभापतींनी सुमारे २० लाख रुपये, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना प्रत्येकी सात लाखांची कामे सुचवण्याच्या प्रयत्नाला कडाडून विरोध झाला. निधीचे समान वाटप करावे, अन्यथा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले यांनी घेतला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यावर यामध्ये समन्वय साधत तीन लाखांऐवजी पाच लाखांचा निधी विरोधकांना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शासकीय निधीचा अपहार करण्याच्या प्रकरणात अग्रेसर असणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील ११ अंगणवाड्यांची बांधकामे न करता परस्पर पैसे काढण्याचा प्रकार सभेत गाजला. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवक आणि ठेकेदारांवर कडक कारवाईसह सरपंचाच्या अपात्रतेसंबंधीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सदस्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली. जि.पच्या सुरुवातीपासून अनधिकृत शाळांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला जात असला, तरी त्यावर आजपर्यंत कारवाई होत नसल्याने या मुद्द्यावरही चर्चा होत कारवाईची मागणी करण्यात आली.

वाढवण बंदराला सर्वांचाच विरोधवाढवण बंदराविरोधात ठराव घेण्याची मागणी शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा यांनी केल्यानंतर सर्वांनी बंदराला आपला विरोध दर्शविला. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांतील रुग्णांना वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना २५ रुग्णवाहिका भेट दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.