शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

अखर्चिक 57 कोटींचा निधी विकासकामांवर खर्च करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:18 IST

जि.प. सर्वसाधारण सभा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्हा परिषदेचा अखर्चिक राहिलेला ५७ कोटींचा निधी कुठल्याही परिस्थितीत परत न जाता त्याचा वापर मार्चअखेर जिल्ह्यातील विकासात्मक बाबींसाठी खर्च केला जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी जि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यापुढे विभागप्रमुख किंवा अधिकारीवर्ग बैठकीत हजर राहणार नाही, अशांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या सुमारे सात कोटी ५० लाख निधीवर सत्ताधारी पक्षाने स्वतःचे वर्चस्व गाजवत अधिकाधिक निधी आपल्याकडे कसा राहील, अशा आखलेल्या डावाला विरोधी पक्षाने कडवा विरोध दर्शविला. त्यामुळे या निधीची समान विभागणी न करता पाच सभापतींनी सुमारे २० लाख रुपये, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना प्रत्येकी सात लाखांची कामे सुचवण्याच्या प्रयत्नाला कडाडून विरोध झाला. निधीचे समान वाटप करावे, अन्यथा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले यांनी घेतला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यावर यामध्ये समन्वय साधत तीन लाखांऐवजी पाच लाखांचा निधी विरोधकांना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शासकीय निधीचा अपहार करण्याच्या प्रकरणात अग्रेसर असणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील ११ अंगणवाड्यांची बांधकामे न करता परस्पर पैसे काढण्याचा प्रकार सभेत गाजला. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवक आणि ठेकेदारांवर कडक कारवाईसह सरपंचाच्या अपात्रतेसंबंधीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सदस्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली. जि.पच्या सुरुवातीपासून अनधिकृत शाळांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला जात असला, तरी त्यावर आजपर्यंत कारवाई होत नसल्याने या मुद्द्यावरही चर्चा होत कारवाईची मागणी करण्यात आली.

वाढवण बंदराला सर्वांचाच विरोधवाढवण बंदराविरोधात ठराव घेण्याची मागणी शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा यांनी केल्यानंतर सर्वांनी बंदराला आपला विरोध दर्शविला. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांतील रुग्णांना वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना २५ रुग्णवाहिका भेट दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.