शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

अखर्चिक 57 कोटींचा निधी विकासकामांवर खर्च करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:18 IST

जि.प. सर्वसाधारण सभा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्हा परिषदेचा अखर्चिक राहिलेला ५७ कोटींचा निधी कुठल्याही परिस्थितीत परत न जाता त्याचा वापर मार्चअखेर जिल्ह्यातील विकासात्मक बाबींसाठी खर्च केला जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी जि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यापुढे विभागप्रमुख किंवा अधिकारीवर्ग बैठकीत हजर राहणार नाही, अशांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या सुमारे सात कोटी ५० लाख निधीवर सत्ताधारी पक्षाने स्वतःचे वर्चस्व गाजवत अधिकाधिक निधी आपल्याकडे कसा राहील, अशा आखलेल्या डावाला विरोधी पक्षाने कडवा विरोध दर्शविला. त्यामुळे या निधीची समान विभागणी न करता पाच सभापतींनी सुमारे २० लाख रुपये, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना प्रत्येकी सात लाखांची कामे सुचवण्याच्या प्रयत्नाला कडाडून विरोध झाला. निधीचे समान वाटप करावे, अन्यथा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले यांनी घेतला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यावर यामध्ये समन्वय साधत तीन लाखांऐवजी पाच लाखांचा निधी विरोधकांना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शासकीय निधीचा अपहार करण्याच्या प्रकरणात अग्रेसर असणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील ११ अंगणवाड्यांची बांधकामे न करता परस्पर पैसे काढण्याचा प्रकार सभेत गाजला. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवक आणि ठेकेदारांवर कडक कारवाईसह सरपंचाच्या अपात्रतेसंबंधीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सदस्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली. जि.पच्या सुरुवातीपासून अनधिकृत शाळांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला जात असला, तरी त्यावर आजपर्यंत कारवाई होत नसल्याने या मुद्द्यावरही चर्चा होत कारवाईची मागणी करण्यात आली.

वाढवण बंदराला सर्वांचाच विरोधवाढवण बंदराविरोधात ठराव घेण्याची मागणी शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा यांनी केल्यानंतर सर्वांनी बंदराला आपला विरोध दर्शविला. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांतील रुग्णांना वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना २५ रुग्णवाहिका भेट दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.