शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नाव-नंबर नसलेल्या बोटींवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:22 IST

घातपातासाठी होऊ शकतो वापर; पोलीस अधीक्षक पाठवणार पत्र

- हितेन नाईकपालघर : खानिवडे आणि खार्डी किनाऱ्यावर बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन करणाºया २३० बोटींवर पालघर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली होती. यातील एकाही बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने या बोटींचा देशविघातक कार्यासाठी वापर होण्याची शक्यता पाहता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने अशा नाव-नंबर नसलेल्या बोटींवर मरिन अ‍ॅक्टनुसार कारवाई करावी, यासाठी पोलीस अधीक्षक पत्रव्यवहार करणार आहेत.जिल्ह्यातील वसई तालुक्यातील खानिवडे, नारिंगी, बहाडोली, मुरबे आदी भागात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन केले जात असून लोखंडी आणि फायबर बोटींचा वापर यासाठी केला जातो. सुमारे दीड ते दोन हजार बोटींचा वापर यासाठी केला जात असून या बोटींची नोंद महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या बांद्रा कार्यालयातून केली जात आहे. मात्र या बोटींपैकी बहुतांशी बोटींची नोंद केलीच जात नसल्याची माहिती समोर येत असून जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, तारापूर, केळवे, दातीवरे, डहाणू, अर्नाळा, वसई आदी भागात बांधण्यात आलेली मेरिटाइम बोर्डाची कार्यालये नावापुरती असून या कार्यालयात नियुक्त अधिकारी उपस्थित राहात नसल्याने या कार्यालयांना नेहमीच कुलूप लावलेले आढळून येत आहे. बोटीवर नाव आणि नंबर नसल्यास कारवाई करण्याचे अधिकार त्या त्या भागातील बंदर अधिकाºयाला असतानाही बोटीवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे.पाणजू बेटाजवळ दोन वर्षांपूर्वी रेती उत्खनन करण्याच्या नावाखाली गेलेल्या बोटीवर डहाणू कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. त्या वेळी परप्रांतातल्या कामगारांना अटक करण्यात आली होती.या कारवाईदरम्यान अनेक कामगारांनी समुद्रात उड्या मारून तिवरांच्या जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. इतकी गंभीर घटना घडल्यानंतर आजही रेती उत्खनन करणाºया बोटींवर नाव नंबर टाकले जात नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी टाकलेल्या धाडीदरम्यान दिसून आले होते. आजही या बोटीत कार्यरत कामगार हे परप्रांतातले असल्याने एखादी घातपाताची घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पोलीस अधीक्षकांना पत्रकार परिषदेत विचारला गेला असता यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाºयांना कारवाईबाबत कळविण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.नाव, नंबर नसलेल्या बोटीवर मरिन अ‍ॅक्टनुसार महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने कारवाई करावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यातयेईल.- दत्तात्रेय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर