शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

...तर तारापूरच्या उद्योगांवर कारवाई अटळ

By admin | Updated: October 7, 2015 23:56 IST

तारापूर एमआयडीसीमध्ये सध्या कार्यान्वित असलेले सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे पूर्ण क्षमतेने चालवा, अन्यथा कारवाईशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचा इशारा पर्यावरण

बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये सध्या कार्यान्वित असलेले सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे पूर्ण क्षमतेने चालवा, अन्यथा कारवाईशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचा इशारा पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी येथील तारापूर एन्व्हायरन्मेंट प्रोटेक्शन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देऊन प्रक्रिया केंद्राची पाहणी केली.पर्यावरण राज्यमंत्री बुधवारी तारापूर एमआयडीसीच्या पाहणीकरिता आले होते. प्रथम त्यांनी एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नंतर २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाऊन टीईपीएसच्या डी.के. राऊत, शेट्टी, वेलजी गोगरी, एस.आर. गुप्ता, उदयन सावे इ. पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली.राज्यमंत्र्यांनी प्रथम सीईटीपीच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती घेतली. टीमाचे अध्यक्ष डी.के. राऊत यांनी सीईटीपीच्या अडचणी, क्षमतेपेक्षा जास्त अतिरिक्त येणारे सांडपाणी आणि नवीन सीईटीपी उभारणीस झालेल्या दिरंगाईबाबत संपूर्ण माहिती दिली. मात्र, २५ एमएलडी क्षमता असलेले केंद्र तरी पूर्ण क्षमतेने चालवा. त्याकरिता दीड महिन्याची मुदत दिल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगत तसे आश्वासनही पर्यावरणमंत्र्यांनी घेतले. तसेच मी पुढच्या वेळेस येईन त्या वेळी सुधारणा न दिसल्यास प्रोजेक्ट बंद करूनच जाईन, असे सांगितले.झीरो डिस्चार्ज कन्सेंट असलेल्या उद्योगामधूनच जास्त पाणी येत असल्याचे पर्यावरणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पंचायत समिती सदस्य विपुल पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर, दांडीचे विजय तामोरे व सालवडचे माजी सरपंच संजय पाटील इ.नी सीईटीपीतून प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे शेतजमीन व खाडीकिनारे प्रदूषित होऊन भूमिपुत्र उद्ध्वस्त होत असल्याचे सांगितले. उद्योग सीएसआर फंड कोणाला देते, कूपनलिका व विहिरीचे प्रदूषण झालेले पाणी, कॉन्टेसा जवळ २४ तास वाहणारे सांडपाणी इ. तक्रारी पर्यावरणमंत्र्यांसमोर मांडल्या.त्यानंतर, पर्यावरणमंत्र्यांनी एमआयडीसीमधील आरती ड्रग्ज, सारेक्स केमिकल्स, विराज कंपनीमध्ये जाऊन तेथील ईटीपीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी त्यांच्यासोबत एमआयडीसी व एमपीसीबीचे वरिष्ठ अधिकारी होते. तर, झीरो डिस्चार्ज कन्सेंट असलेले उद्योग सांडपाणी सोडत असून त्यांच्यावर काय कार्यवाही करणार, असे पत्रकारांनी विचारताच निश्चितच त्याबाबत गंभीर दखल घेण्यात येईल, असे सांगून अधिक उत्तर देण्याचे टाळले. (वार्ताहर)