शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

‘ब्रेनड्रेन’ थांबविण्याकरिता कृती आराखडा

By admin | Updated: October 15, 2015 01:25 IST

कोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या निमित्ताने तरुणांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते.

जयंत धुळप, अलिबागकोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या निमित्ताने तरुणांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. ग्रामीण भागातील तरुणांनी जर तेथेच राहून तेथील महाविद्यालयांतून विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याच ग्रामीण भागात नोकरी वा उद्योग केला तर हे ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारा ‘ब्रेनड्रेन’ थांबविणे शक्य होवू शकते आणि या प्रक्रियेकरिता मुंबई विद्यापीठाचा नवा कृती आराखडा निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.बुधवारी त्यांनी आवर्जून ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. त्यांनी कार्यालयातील स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना मुंबई विद्यापीठाच्या नव्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, महिलांच्या शैक्षणिक व विशेषत: महाविद्यालयीन शिक्षणाकरिता ग्रामीण भागात अद्याप अपेक्षित तितक्या सुविधा नाहीत. अलिबाग पेझारी येथे महिलांकरिता महाविद्यालय आहे, ही आनंदाची बाब आहे. खाजगी संस्थांच्या माध्यमातून महिलांकरिता महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, जेणेकरून महिलांना शिक्षणाच्या अधिक संधी आणि त्याही आपल्या परिसरातच उपलब्ध होऊ शकतील.