शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वर्गणीची खंडणी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई!

By admin | Updated: August 7, 2016 03:33 IST

राज्य सरकार व उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे. त्याची पायमल्ली करणाऱ्या मंडळ व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणारच

- शशी करपे, वसईराज्य सरकार व उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे. त्याची पायमल्ली करणाऱ्या मंडळ व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणारच, असा इशारा वसईचे पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी वसईतील गणेश मंडळांना दिले आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि पोलीस कारवाईची कटुता टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पोलिसांनी गणेशोत्सवानिमित्ताने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पहिली बैठक नालासोपारा येथे पार पडली. त्यात त्यांनी कृत्रिम तलावातच विसर्जन झाले पाहिजे असा आग्रह धरला. राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावयाचे असल्याने गणेश मंडळांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला सहकार्य करणचे आवाहन केले. अन्यथा मंडळ आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. मंडप टाकण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी सार्वजनिक मंडळांना दिली जाणार नाही, अशी तंबीही मंडळांना पोलिसांनी दिली आहे. रात्री दहानंतर स्पीकर वापरण्यास बंदी असून तिचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शांतता व निवासी झोनमध्ये आवाजाची मर्यादा ५५, वाणिज्य झोनमध्ये ६५ डेसिबल आहे. ती न पाळणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. यावेळी एक लाख रुपे दंडासह सामान जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. मंडळांची कागदपत्रे योग्य असतील त्यांनाच परवानगी दिली जाईल. यावेळी मंडळाचे रजिस्टे्रशन तपासले जाणार आहे. दमदाटी, मारहाण किंंवा शिवीगाळ करून जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत असल्याची तक्रार आल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिला. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने तयारी सुरु केली असून दोन कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. पालिकेने प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी शंभर फूट बाय शंभर फूट लांब, रुंद आणि आठ फूट खोलीचे तलाव खोदून त्यात प्लॅस्टिकचा कागद टाकून पाणी साठवले जाणार आहे. त्यात चार फूटापर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. चार फूटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात केले जाणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे प्रमुख त्यात-त्या प्रभागाचे सभापती असतील. या समितीत पोलिसांनाही घेण्यात आले आहे. त्यांच्या सहकार्याने कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची मोहिम यशस्वी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.