शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीची खंडणी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई!

By admin | Updated: August 7, 2016 03:33 IST

राज्य सरकार व उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे. त्याची पायमल्ली करणाऱ्या मंडळ व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणारच

- शशी करपे, वसईराज्य सरकार व उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे. त्याची पायमल्ली करणाऱ्या मंडळ व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणारच, असा इशारा वसईचे पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी वसईतील गणेश मंडळांना दिले आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि पोलीस कारवाईची कटुता टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पोलिसांनी गणेशोत्सवानिमित्ताने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पहिली बैठक नालासोपारा येथे पार पडली. त्यात त्यांनी कृत्रिम तलावातच विसर्जन झाले पाहिजे असा आग्रह धरला. राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावयाचे असल्याने गणेश मंडळांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला सहकार्य करणचे आवाहन केले. अन्यथा मंडळ आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. मंडप टाकण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी सार्वजनिक मंडळांना दिली जाणार नाही, अशी तंबीही मंडळांना पोलिसांनी दिली आहे. रात्री दहानंतर स्पीकर वापरण्यास बंदी असून तिचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शांतता व निवासी झोनमध्ये आवाजाची मर्यादा ५५, वाणिज्य झोनमध्ये ६५ डेसिबल आहे. ती न पाळणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. यावेळी एक लाख रुपे दंडासह सामान जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. मंडळांची कागदपत्रे योग्य असतील त्यांनाच परवानगी दिली जाईल. यावेळी मंडळाचे रजिस्टे्रशन तपासले जाणार आहे. दमदाटी, मारहाण किंंवा शिवीगाळ करून जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत असल्याची तक्रार आल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिला. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने तयारी सुरु केली असून दोन कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. पालिकेने प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी शंभर फूट बाय शंभर फूट लांब, रुंद आणि आठ फूट खोलीचे तलाव खोदून त्यात प्लॅस्टिकचा कागद टाकून पाणी साठवले जाणार आहे. त्यात चार फूटापर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. चार फूटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात केले जाणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे प्रमुख त्यात-त्या प्रभागाचे सभापती असतील. या समितीत पोलिसांनाही घेण्यात आले आहे. त्यांच्या सहकार्याने कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची मोहिम यशस्वी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.