शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

परिवहन स्टँडविरोधात कारवाई होणार, नालासोपारा स्टँडमधील अवैध पार्किंगविरोधात मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 02:17 IST

अवघ्या दोन दिवसांसाठी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या परिवहन सेवेने उभारलेल्या बस स्टँडच्या विरोधात एसटी महामंडळ कारवाई करणार आहे.

शशी करपेवसई : अवघ्या दोन दिवसांसाठी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या परिवहन सेवेने उभारलेल्या बस स्टँडच्या विरोधात एसटी महामंडळ कारवाई करणार आहे. त्याचबरोबर नालासोपारा एसटी स्टँडमधील बेकायदा पार्किंगवर पोलिसांच्या मदतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तर मुंबई हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जनआंदोलन समिती एसटी आणि परिवहन सेवेविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे.नालासोपारा एसटी स्टँडमध्ये सध्या खाजगी व चारचाकी वाहनांनी बेकायदा पार्किंग सुरु केले आहे. त्यातच रिक्शा चालकांनी अतिक्रमण करून बेकायदा स्टँड तयार केला आहे. गेल्या आठवड्यात रिक्शांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांना एका रिक्षा चालकाने धक्काबुक्की केली होती. ही कमी म्हणून की काय आता तर वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने चक्क बस स्टँड तयार केले आहे.एसटी स्टँडच्या दोनशे मीटर परिसरात खाजगी प्रवासी वाहनांना प्रवेश करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, स्थानिक अधिकाºयांनीच कायदा मोडीत काढला आहे. या बेकायका पार्किंगविरोधात एसटीचे स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालघर विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. स्टँडमधील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली आहे. वसईचे अपर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांच्या समवेत त्यांनी बैठक घेऊन ही मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच स्टँडमधील पार्किंग हटवण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. आता ही कार्यवाही प्रत्यक्षात कधी आणि कशी सुरू होते याकडे संपूर्ण वसई, विरारकरांचे लक्ष लागून राहिलेलआहे.अवमान याचिका दाखल होणार-प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी आणि परिवहन सेवेने सेवा द्यावी असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, एसटीने काही शालेय प्रवासी सेवा वगळता १३ डिसेंबरपासून वसई आणि नालासोपारा एसटी डेपोतील शहरी वाहतूक बंद केली आहे. नालासोपारा डेपोतून सत्पाळा मार्गे राजोडी उमराळे हीच एसटी सुरु ठेवली आहे. तर वसई डेपोतून फक्त रानगाव एसटी सुरु ठेवण्यात आलेली आहे. दुसरीकडे, एसटी प्रमाणे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बस सेवा देण्यात महापालिकेची परिवहन सेवा अपयशी ठरली आहे.एसटी पहाटेच्या पहिल्या लोकलपासून शेवटच्या लोकलपर्यंत बस सेवा देत होती. पण, महापालिकेच्या बहुतांश सेवा रात्री दहाच्या सुमारास बंद होत आहेत. तर पहाटे सहानंतरच सेवा सुरु केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा व याचिकाकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी केला आहे. एसटी आणि परिवहन सेवेने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली जाणार आहे, असे डाबरे यांनी सांगितले.