शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांवरील कारवाई कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 00:06 IST

वाहनचालकांकडून सातत्याने नियमभंग : दुचाकीस्वारांमध्ये फॅड, वाहतूक पोलिसांचा कानाडोळा

मंगेश कराळे

नालासोपारा : रस्त्यावर थोडावेळ जरी वाहतूक थांबली की, कर्णकर्कश हॉर्न वाजवत राहण्याचे फॅड वाहनचालकांमध्ये विशेषत: दुचाकीस्वारांमध्ये वाढले आहे. काही जणांना तर इतकी घाई असते की, पूर्ण रस्ता मोकळा होईपर्यंत हॉर्न वाजवत बसतात. अशा वाहनचालकांवर, दुचाकीस्वारांवर आणि रिक्षांवर कारवाई करणे खूप गरजेचे झाले आहे, पण वाहतूक पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याने वाहनचालकांना मोकळे रान मिळाले आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कारवाई केल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

गेल्यावर्षात कोरोना असल्यामुळे ही कारवाई करता आली नसल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. सध्या रिक्षांमध्ये लावण्यात आलेला डीजे, कर्णकर्कश हॉर्न आणि फटाके फोडणारे सायलेन्सर वाहनांवर कारवाईचे दावे कागदावरच असल्याचे बोलले तर वावगे ठरणार नाही. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, कॉलेज, शाळा, क्लासेस, मॉलच्या जवळ मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजवून किंवा सायलेन्सरद्वारे फटाके फोडून लोकांना, महिलांना, तरुण-तरुणींना आकर्षित करण्याची एक फॅशन झाली आहे. जोरजोरात हॉर्न वाजवून वेगाने दुचाकी चालवणाऱ्या तरुणांमध्ये वाढ झाली आहे. काही दुचाकीस्वार तरुणांमध्ये एकमेकांना खुन्नस देण्यासाठी हॉर्न वाजविण्याचे प्रकार घडत असून याचे रूपांतर नंतर वादात, भांडणात झाले आहे. वाहतुकीच्या नियमांनुसार हॉर्न कधी व कशासाठी वाजवावेत, कुठे वाजवू नयेत याचेही काही नियम आहेत. हॉस्पिटल, सरकारी कार्यालये, कोर्ट, शाळा, कॉलेज अशा ठिकाणी ‘नो हॉर्न’ असा फलक लावलेला असतो. परंतु, या ठिकाणी बिनधास्तपणे नियम पायदळी तुडवून हॉर्न वाजवला जातो. काही दुचाकीस्वारांनी तर पोलिसांचा सायरन लावला आहे. 

कारवाई होतेय कुठे?कर्णकर्कश हॉर्न आणि सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे आवाज करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कारवाई करत असल्याचे वाहतूक पोलिसांचे दावे कितपत खरे आहेत, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

कारवाईत आर्थिक दंडाची तरतूदशहरात दुचाकी वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनांमध्ये आणि दुचाकींमध्ये मोडिफिकेशन करून जास्त आवाजाचे सायलेन्सर, हॉर्न बसविण्यात येतात. मोटार वाहन कायद्याअंतर्गत ध्वनिप्रदूषण करणारे कर्णकर्कश हॉर्न व फटाके फोडणारे सायलेन्सर असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे, पण वाहतूक पोलिसांनी कानाडोळा करीत ठोस कारवाई करत नाही. त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कारवाई केली आहे. 

आमच्या विभागाकडून कारवाई सुरूच असते आणि ती सुरूच राहणार आहे. आता या वाहनांवर, दुचाकींवर कारवाई करण्यासाठी लवकरच विशेष मोहीम हाती घेणार असून वाहतूक विभागाच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देणार आहे. - विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

वाहतूककोंडी असल्यावर हॉर्नचा वापर सातत्याने केला जातो, पण याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. कोरोनाकाळात सहा ते सात महिने कारवाईत काही प्रमाणात शिथिलता आल्याने ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांचे चांगले फावले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार