शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

अपघातात पतीपत्नी जागीच ठार

By admin | Updated: January 6, 2017 06:02 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेस जवळ झालेल्या टेम्पो लक्झरी बस अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी उंच डिव्हायडर असता

मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेस जवळ झालेल्या टेम्पो लक्झरी बस अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी उंच डिव्हायडर असता तर त्या दोघांचे प्राण वाचले असते. आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये आय आर बी कंपनीने रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना प्राणस मुकावे लागते.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने टेम्पो जात असताना त्याचे पुढचे उजवे टायर फुटले चालकाचा ताबा सुटला व डिव्हायडरची उंची कमी असल्याने मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरी बसला त्याने धडक दिल्याने टेम्पोमध्ये असलेले सुनील रामू पवार , चालक व त्याची पत्नी देवी यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही भिवंडी येथील असून त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास सपोनि अक्षय सोनावणे करीत आहेत.मुंबई-अहमदाबाद रा. महामार्गावर होणारे अपघात आहेत त्यास जबाबदार आय आर बी कंपनी व एन एच आय असून अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये त्रुटी ठेवल्या आहे कुठे डीव्हायडर उंची कमी, रस्त्याचे काम अपुर्ण तर कुठे तीन रस्त्यानंतर अचानक त्याचे दोन लाईन होणे, अवैध क्रॉसिंग त्यामुळे अपघात होतात अशी प्रतिक्रिया आदिवासी पुनर्वसन संघटनेचे कार्यकर्ते अविनाश पाटील यांनी लोकमतकडे व्यक्त केली. (वार्ताहर)