शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

प्रदूषणकारी कंपन्यांना अभय? प्रांत म्हणतात, ‘मी टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:48 IST

तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अभय देतात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अभय देतात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर सुनावणी घेणाºया उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपण टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नसल्याने ठोस कारवाई करता येत नसल्याचे सांगून कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.लोकमतने ‘आबिटघर गाव घातक प्रदूषणाच्या विळख्यात’ या मथळ्याखाली दि. ११ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कारखानदार व अधिकाºयांचे चांगलेच धाबे दणाणले होते. यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींसंदर्भात वाड्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १५) सुनावणी घेतली. मात्र या सुनावणी दरम्यान उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुजित डोलम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासन ह्या घातक प्रदुषणकारी कारखान्यांना अभय देत असल्याचा आरोप तक्रारदार विश्वास पाटील व आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे.सुनावणीप्रसंगी तक्रारदार विश्वास पाटील यांनी ठाम भूमिका घेत कारखान्यांमुळे होणाºया प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले. त्याला उपस्थित गावकºयांनीही दुजोरा दिला.मात्र, डोलम यांनी सादर केलेल्या अहवालात कारखान्यांकडून होणारे प्रदूषण हे घातक नसल्याचा निर्वाळा दिल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. यामुळे प्रशासनाने सुनावणी घेऊन प्रदूषणाविरोधात सुरु केलेली कारवाई ही केवळ फार्स ठरण्याचीच शक्यता अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी करावी, अशी मागणी होते आहे.प्रदूषणकारी कारखान्यांना यापूर्वी वारंवार नोटीस बजावून सुधारणा करावयास सांगितले आहे. सद्यस्थितीत असलेली प्रदूषणाची पातळी घातक नसल्याने कारखाने बंद करण्याची कारवाई करता येत नाही.- सुजित डोलम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, कल्याणप्रदूषणासंदर्भात टेक्निकल अ‍ॅथॉरिटी ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. आपण या परिसराची पहाणी करणार आहोत. परंतु कारवाईचे अधिकार देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाला असल्याने यासंदर्भात त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे.- मोहन नळदकर,उपविभागीय अधिकारी, वाडाप्रदुषणकारी कारखान्यांना प्रशासन पाठीशी घालेल याची भीती आहेच. स्थानिकांच्या आरोग्यासाठी प्रदूषणाविरोधात आम्ही आमची लढाई सुरु ठेवू.-विश्वास पाटील, तक्र ारदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरार