शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

प्रदूषणकारी कंपन्यांना अभय? प्रांत म्हणतात, ‘मी टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:48 IST

तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अभय देतात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अभय देतात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर सुनावणी घेणाºया उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपण टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नसल्याने ठोस कारवाई करता येत नसल्याचे सांगून कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.लोकमतने ‘आबिटघर गाव घातक प्रदूषणाच्या विळख्यात’ या मथळ्याखाली दि. ११ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कारखानदार व अधिकाºयांचे चांगलेच धाबे दणाणले होते. यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींसंदर्भात वाड्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १५) सुनावणी घेतली. मात्र या सुनावणी दरम्यान उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुजित डोलम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासन ह्या घातक प्रदुषणकारी कारखान्यांना अभय देत असल्याचा आरोप तक्रारदार विश्वास पाटील व आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे.सुनावणीप्रसंगी तक्रारदार विश्वास पाटील यांनी ठाम भूमिका घेत कारखान्यांमुळे होणाºया प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले. त्याला उपस्थित गावकºयांनीही दुजोरा दिला.मात्र, डोलम यांनी सादर केलेल्या अहवालात कारखान्यांकडून होणारे प्रदूषण हे घातक नसल्याचा निर्वाळा दिल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. यामुळे प्रशासनाने सुनावणी घेऊन प्रदूषणाविरोधात सुरु केलेली कारवाई ही केवळ फार्स ठरण्याचीच शक्यता अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी करावी, अशी मागणी होते आहे.प्रदूषणकारी कारखान्यांना यापूर्वी वारंवार नोटीस बजावून सुधारणा करावयास सांगितले आहे. सद्यस्थितीत असलेली प्रदूषणाची पातळी घातक नसल्याने कारखाने बंद करण्याची कारवाई करता येत नाही.- सुजित डोलम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, कल्याणप्रदूषणासंदर्भात टेक्निकल अ‍ॅथॉरिटी ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. आपण या परिसराची पहाणी करणार आहोत. परंतु कारवाईचे अधिकार देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाला असल्याने यासंदर्भात त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे.- मोहन नळदकर,उपविभागीय अधिकारी, वाडाप्रदुषणकारी कारखान्यांना प्रशासन पाठीशी घालेल याची भीती आहेच. स्थानिकांच्या आरोग्यासाठी प्रदूषणाविरोधात आम्ही आमची लढाई सुरु ठेवू.-विश्वास पाटील, तक्र ारदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरार