शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

विद्यार्थिनींनी रचली अपहरणाची कहाणी; मीरा रोडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 03:00 IST

एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत.

मीरा रोड : आई मारते म्हणून निघून गेलेल्या चौथीच्या विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीसोबत पळून विरार गाठले. पण नंतर मात्र दोघींनी बुरखाधारी महिलेसह वाहनचालकाने अपहरण केले, अशी कहाणी रचल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली.एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत. बुधवारी सायंकाळी शाळेतून सुटल्या असता होली क्रॉस शाळेसमोरील रस्त्यावर अचानक पांढºया रंगाची गाडी आली. त्यातून एक बुरखाधारी महिला बाहेर आली आणि दोघींना गाडीत बसवले. गाडी चालवणाºयानेही तोंडावर मास्क घातले होते. गाडीची काच बंद असल्याने मदतीसाठी आरडाओरडा करूनही आवाज बाहेर गेला नाही. महिलेने चाकूचा धाक दाखवून ओरडणे बंद करण्याचा दम दिला. त्यामुळे दोघींनी ओरडणे बंद केले.गाडी बरीच पुढे गेली असता संधी साधून एकीने महिलेच्या हाताचा चावा घेतला. तर, दुसरीने गाडीचे दार उघडत दोघी धावल्या. चालकाने पाठलाग केला, परंतु वर्दळ असल्याने तो मागे फिरला. दोघींनी तेथे असलेल्या सरबतविक्रेत्यास विचारणा केली असता त्या विरार पश्चिमेला असल्याचे कळले. सरबतवाल्याकडून मोबाइल घेऊन आईला फोन केला व घडलेला प्रकार सांगितला.विरार पोलीस ठाण्यात फिर्यादीसाठी गेल्यावर तेथील पोलिसांनी त्यांना नयानगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. गुरुवारी मुलीच्या फिर्यादीनंतर नयानगर पोलिसांनी बुरखाधारी महिला व चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.दरम्यान, पोलीस तपासात मात्र अपहरणाचा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. शाळेत दिलेला अभ्यास झाला नसल्याने घरचे मारतील, या भीतीने दोघींनी शाळा सुटल्यावर थेट विरार गाठले.विरारला त्या लोकलने गेल्याचा संशय आहे. विरार पश्चिमेस सरबतविक्रेत्यास या दोघी मुली दिसल्याने त्याने दोघींची विचारपूस केली. दोघी मुली मीरा रोडच्या असल्याचे कळल्याने त्याने एकीकडून तिच्या आईचा मोबाइल क्रमांक घेऊन दोघी मुली विरारला आपल्याकडे सुखरूप असल्याचे कळविले.तपासात खरे झाले उघडघरचे मारतील म्हणून या दोघींनी अपहरणाची कहाणी रचली असल्याची माहिती सहायक निरीक्षक सुभाष ठाकूर यांनी दिली. मुलींनी आधी अपहरणाची माहिती दिल्याने त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पण, तपासात मुलींनी नेमका प्रकार सांगितला. मुली मिळाल्याचे कळताच पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तेही कहाणीने चक्रावून गेले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर