शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

विद्यार्थिनींनी रचली अपहरणाची कहाणी; मीरा रोडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 03:00 IST

एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत.

मीरा रोड : आई मारते म्हणून निघून गेलेल्या चौथीच्या विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीसोबत पळून विरार गाठले. पण नंतर मात्र दोघींनी बुरखाधारी महिलेसह वाहनचालकाने अपहरण केले, अशी कहाणी रचल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली.एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत. बुधवारी सायंकाळी शाळेतून सुटल्या असता होली क्रॉस शाळेसमोरील रस्त्यावर अचानक पांढºया रंगाची गाडी आली. त्यातून एक बुरखाधारी महिला बाहेर आली आणि दोघींना गाडीत बसवले. गाडी चालवणाºयानेही तोंडावर मास्क घातले होते. गाडीची काच बंद असल्याने मदतीसाठी आरडाओरडा करूनही आवाज बाहेर गेला नाही. महिलेने चाकूचा धाक दाखवून ओरडणे बंद करण्याचा दम दिला. त्यामुळे दोघींनी ओरडणे बंद केले.गाडी बरीच पुढे गेली असता संधी साधून एकीने महिलेच्या हाताचा चावा घेतला. तर, दुसरीने गाडीचे दार उघडत दोघी धावल्या. चालकाने पाठलाग केला, परंतु वर्दळ असल्याने तो मागे फिरला. दोघींनी तेथे असलेल्या सरबतविक्रेत्यास विचारणा केली असता त्या विरार पश्चिमेला असल्याचे कळले. सरबतवाल्याकडून मोबाइल घेऊन आईला फोन केला व घडलेला प्रकार सांगितला.विरार पोलीस ठाण्यात फिर्यादीसाठी गेल्यावर तेथील पोलिसांनी त्यांना नयानगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. गुरुवारी मुलीच्या फिर्यादीनंतर नयानगर पोलिसांनी बुरखाधारी महिला व चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.दरम्यान, पोलीस तपासात मात्र अपहरणाचा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. शाळेत दिलेला अभ्यास झाला नसल्याने घरचे मारतील, या भीतीने दोघींनी शाळा सुटल्यावर थेट विरार गाठले.विरारला त्या लोकलने गेल्याचा संशय आहे. विरार पश्चिमेस सरबतविक्रेत्यास या दोघी मुली दिसल्याने त्याने दोघींची विचारपूस केली. दोघी मुली मीरा रोडच्या असल्याचे कळल्याने त्याने एकीकडून तिच्या आईचा मोबाइल क्रमांक घेऊन दोघी मुली विरारला आपल्याकडे सुखरूप असल्याचे कळविले.तपासात खरे झाले उघडघरचे मारतील म्हणून या दोघींनी अपहरणाची कहाणी रचली असल्याची माहिती सहायक निरीक्षक सुभाष ठाकूर यांनी दिली. मुलींनी आधी अपहरणाची माहिती दिल्याने त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पण, तपासात मुलींनी नेमका प्रकार सांगितला. मुली मिळाल्याचे कळताच पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तेही कहाणीने चक्रावून गेले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर