शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वसई येथील अपघातग्रस्त कुटुंबास ९३ लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:26 IST

गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: वळिव नाक्यावरील किचन गार्डन हॉटेलजवळ सात वर्षांपूर्वी झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या बिनोद पांडे या व्यावसायिकाच्या कुटुंबास मुंबई उच्च न्यायालयाने सुमारे ९३ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. ही भरपाई सन २०१२ पासूनच्या आठ टक्के व्याजासह असल्याने पांडे यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्षात सुमारे दीड कोटी रुपये मिळतील.

गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तो टँकर पेल्हार येथील हकीम हरून खान यांच्या मालकीचा होता व त्याचा विमा युनायटेड इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीने उतरविला होता. या अपघाती मृत्यूबद्दल पांडे यांच्या विधवा पत्नी कुंती व राहुल (१६ वर्षे), अमर (१२) आणि अंजली (८) या मुलांनी केलेल्या दाव्यात वसई येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ८९.७५ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. नोटीस काढूनही टँकरमालक किंवा विमा कंपनी हजर न झाल्याने तो दावा एकतर्फी निकाली काढला गेला होता.

भरपाईचा हा निकाल रद्द करून घेण्यासाठी विमा कंपनीने तर भरपाई वाढविण्यासाठी पांडे कुटुंबियांनी अशी दोन अपिले उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्या. रमेश धानुका यांनी अंतिम सुनावणीनंतर विमा कंपनीचे अपील फेटाळले व पांडे कुटुंबियांचे अपील मंजूर करून भरपाईच्या रकमेत वाढ केली. सज्ञान झाल्यानंतर तिन्ही मुले भरपाईची रक्कम काढून घेऊन तिचा हवा तसा विनियोग करू शकतील.

या अपघातास टँकरचा ड्रायव्हर एकटा जबाबदार नव्हता. पांडे यांचीही त्यात चूक होती. त्यामुळे मुळात त्यांचे कुटुंब भरपाई मिळण्यासच पात्र नाही इथपासून ते भरपाईचा हिशेब चुकीने केला गेला आहे इथपर्यंत अनेक मुद्दे विमा कंपनीने अपिलात मांडले. परंतु ते अमान्य केले गेले.