शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

वसई येथील अपघातग्रस्त कुटुंबास ९३ लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:26 IST

गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: वळिव नाक्यावरील किचन गार्डन हॉटेलजवळ सात वर्षांपूर्वी झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या बिनोद पांडे या व्यावसायिकाच्या कुटुंबास मुंबई उच्च न्यायालयाने सुमारे ९३ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. ही भरपाई सन २०१२ पासूनच्या आठ टक्के व्याजासह असल्याने पांडे यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्षात सुमारे दीड कोटी रुपये मिळतील.

गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तो टँकर पेल्हार येथील हकीम हरून खान यांच्या मालकीचा होता व त्याचा विमा युनायटेड इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीने उतरविला होता. या अपघाती मृत्यूबद्दल पांडे यांच्या विधवा पत्नी कुंती व राहुल (१६ वर्षे), अमर (१२) आणि अंजली (८) या मुलांनी केलेल्या दाव्यात वसई येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ८९.७५ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. नोटीस काढूनही टँकरमालक किंवा विमा कंपनी हजर न झाल्याने तो दावा एकतर्फी निकाली काढला गेला होता.

भरपाईचा हा निकाल रद्द करून घेण्यासाठी विमा कंपनीने तर भरपाई वाढविण्यासाठी पांडे कुटुंबियांनी अशी दोन अपिले उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्या. रमेश धानुका यांनी अंतिम सुनावणीनंतर विमा कंपनीचे अपील फेटाळले व पांडे कुटुंबियांचे अपील मंजूर करून भरपाईच्या रकमेत वाढ केली. सज्ञान झाल्यानंतर तिन्ही मुले भरपाईची रक्कम काढून घेऊन तिचा हवा तसा विनियोग करू शकतील.

या अपघातास टँकरचा ड्रायव्हर एकटा जबाबदार नव्हता. पांडे यांचीही त्यात चूक होती. त्यामुळे मुळात त्यांचे कुटुंब भरपाई मिळण्यासच पात्र नाही इथपासून ते भरपाईचा हिशेब चुकीने केला गेला आहे इथपर्यंत अनेक मुद्दे विमा कंपनीने अपिलात मांडले. परंतु ते अमान्य केले गेले.