शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात ७२.७९% मतदान, नगराध्यक्षपदासाठी पाच महिलांत लढत, ७९ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:46 IST

वाडा नगरपंचायतीच्या सार्वित्रक निवडणुकीत बुधवारी झालेल्या मतदानात सकाळी काही अंशी निरूत्साह असला तरी कालावधी संपला तेंव्हा एकूण ७२.७९ % मतदान झाले दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला.

वाडा : वाडा नगरपंचायतीच्या सार्वित्रक निवडणुकीत बुधवारी झालेल्या मतदानात सकाळी काही अंशी निरूत्साह असला तरी कालावधी संपला तेंव्हा एकूण ७२.७९ % मतदान झाले दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला.नगराध्यक्षपदासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा तर शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर यांच्यात कडवी लढत असून भाजप शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर १७ नगरसेवक पदांकरिता एकूण ७९ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. सकाळी सुरू झालेल्या मतदानात दुपार पर्यंत निरूत्साह दिसत होता. त्यामुळे १२ वाजेपर्यंत अवघे २६ टक्के मतदान झाले होते. परंतु शहरात व्यापारी व नोकरवर्गाची संख्या मोठी असल्याने या मतदारांनी दुपार नंतर मतदान करण्याला पसंती दिली. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान वाढावे म्हणून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रयत्न केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. आज झालेल्या निवडणूकीत भाजप शिवसेना व काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून कॉग्रेसच्या उमेदवार सायली पाटील या किती मतदान घेतात यावर भाजपचे विजयाचे समीकरण अवलंबून आहे. वाडा शहरात संघटनात्मक पातळीवर शिवसेना मजबूत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर आणि भाजपाच्या निशा सवरा यांच्यात ख-या लढतीची शक्यता आहे. भाजपाने मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा हिच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपाला सत्ता विरोधी जनमताचा सामना करावा लागत असला तरी सवरांनी विजयासाठी शथीॅचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रारंभी सोपी वाटणारी निवडणूक शिवसेनेसाठी आव्हान बनली आहे. विशेष म्हणजे नगराध्यपदाच्या सर्वच उमेदवार या प्रथमच ही निवडणूक लढवत आहेत. त्यांची राजकीय पाटी कोरी असल्याने मतदार कुणाला विजय करतील, हे सांगता येणे कठीण आहे.शिवसेनेचा भर व्यक्तिगत प्रचारावर तर भाजपचे हायटेक कॅम्पेनया निवडणुकीत शिवसेनेने प्रत्येक प्रभाग पिंजून काढत आपले मतदान राखण्यावर अधिक भर दिला. प्रचारात भपकेबाजी न करता एकमेव मंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेऊन मतदारांना आवाहन केले. तर भाजपाने तंत्रज्ञानाचाा वापर करून हायटेक प्रचार करत मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला.तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठी रॅली काढून मतदार आपल्याकडे झुकविण्याचा प्रयत्न केला असला तरी मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला हे येत्या १८ तारखेला स्पष्ट होईल. दरम्यान आज मतदानाच्या संपूर्ण दिवसात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक