शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

६९ गावांना ‘सूर्या’चेच पाणी

By admin | Updated: March 30, 2017 05:31 IST

६९ गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याने वसई तालुक्यातील

शशी करपे / वसई६९ गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याने वसई तालुक्यातील ६९ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. सध्या वसई विरार महापालिकेलाच पाणीटंचाई जाणवत असल्याने वाढीव १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर ६९ गावांना पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ६९ गावांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.वसई विरार महापालिका हद्दीतील ६९ गावांना पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २००८ साली मंजूरी दिली होती. या योजनेचे काम २०१० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही ६९ गावांना अद्याप पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी योजना पूर्ण का केली नाही याबाबत जनहित याचिका १२ जून २०१३ रोजी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. इतकेच नाही तर ३० जून २०१४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. मात्र, आतापर्यंत शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च करुनही योजनेचे पाच टक्के काम बाकी असल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. त्यावर कळस म्हणजे जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने राज्य सरकारकडे ३३ कोटी ७८ लाख ९७ हजार रुपयांची मागणी केली असताना सरकारकडून निधी पुरवला न गेल्याने योजना रखडल्याचे उजेडात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या योजनेचे लेखापरिक्षण करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. दरम्यान, समर्थन संस्थेने याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला असता, वसई विरार महापालिकेसाठी वाढीव १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेतून ६९ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या योजनेच्या कामासाठी एकूण चार निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन निविदांना तीन तर एका निविदेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीत ९० कोटी ११ लाख रुपये खर्च झाला असून ९८ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा लोणीकर यांनी केला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार योजनेच्या कामाची तपासणी करण्यासाठी प्राधिकरणाच्या सहाय्यक मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपला अहवाल कोर्टाला १९ आॅगस्ट २०१४ रोजी सादर केल्याची माहितीही लोणीकर यांनी दिली आहे. काय आहे वस्तुस्थिती?सध्या ६९ गावांपैकी ५२ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. या गावांना महापालिकेच्या योजनेतून पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. मात्र, सध्या महापालिका हद्दीत तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ६९ पैकी १० गावांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेला ९२ एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे सूर्यातून वाढीव १०० एमएलडी पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतरच उर्वरित गावांना पाणी दिले जाईल.