शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

६९ गावांना ‘सूर्या’चेच पाणी

By admin | Updated: March 30, 2017 05:31 IST

६९ गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याने वसई तालुक्यातील

शशी करपे / वसई६९ गावांसाठी असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या आठ वर्षांपासून रखडल्याने वसई तालुक्यातील ६९ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. सध्या वसई विरार महापालिकेलाच पाणीटंचाई जाणवत असल्याने वाढीव १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर ६९ गावांना पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ६९ गावांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.वसई विरार महापालिका हद्दीतील ६९ गावांना पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २००८ साली मंजूरी दिली होती. या योजनेचे काम २०१० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही ६९ गावांना अद्याप पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी योजना पूर्ण का केली नाही याबाबत जनहित याचिका १२ जून २०१३ रोजी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला होता. इतकेच नाही तर ३० जून २०१४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. मात्र, आतापर्यंत शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च करुनही योजनेचे पाच टक्के काम बाकी असल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. त्यावर कळस म्हणजे जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने राज्य सरकारकडे ३३ कोटी ७८ लाख ९७ हजार रुपयांची मागणी केली असताना सरकारकडून निधी पुरवला न गेल्याने योजना रखडल्याचे उजेडात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या योजनेचे लेखापरिक्षण करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. दरम्यान, समर्थन संस्थेने याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला असता, वसई विरार महापालिकेसाठी वाढीव १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेतून ६९ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या योजनेच्या कामासाठी एकूण चार निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन निविदांना तीन तर एका निविदेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीत ९० कोटी ११ लाख रुपये खर्च झाला असून ९८ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा लोणीकर यांनी केला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार योजनेच्या कामाची तपासणी करण्यासाठी प्राधिकरणाच्या सहाय्यक मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपला अहवाल कोर्टाला १९ आॅगस्ट २०१४ रोजी सादर केल्याची माहितीही लोणीकर यांनी दिली आहे. काय आहे वस्तुस्थिती?सध्या ६९ गावांपैकी ५२ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. या गावांना महापालिकेच्या योजनेतून पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. मात्र, सध्या महापालिका हद्दीत तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ६९ पैकी १० गावांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेला ९२ एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे सूर्यातून वाढीव १०० एमएलडी पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतरच उर्वरित गावांना पाणी दिले जाईल.