शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

६०० कोटींचा निधी वापराविना परत; सुविधांपासून पालघरवासीय वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 23:53 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

हितेन नाईकपालघर : जिल्ह्याच्या निर्मितीपासून जिल्ह्यातून सुमारे ६०० कोटींचा निधी वापराविना परत गेला असून, आजपर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च करूनही जिल्ह्यातील आरोग्य, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून जिल्हावासीय वंचित राहात आहेत. इथली जनता, शेती आजही पाण्यापासून वंचित असून, कुपोषणाचा डाग पुसून काढण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नियोजन करण्याचे काम ज्या कार्यालयातून चालते, ते कार्यालयच टक्केवारीच्या गणितात अडकून पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी केली आहे.

पालघर जिल्हा शासनाच्या नकाशावर आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र आजही विकासापासून कोसो दूर आहे. मुंबईची तहान भागवण्याची क्षमता जिल्ह्यात असताना, ग्रामीण भागातील गरीब जनता आजही पाण्यापासून वंचित राहत आहे. डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी दगडधोंड्यांची वाट तुडवीत जाण्याचे दुर्भाग्य आजही त्यांच्या नशिबी आहे. जिल्ह्यातील धामणी सूर्या धरण, अप्पर वैतरणा, गारगाई, देहर्जे, लेंडी, खडखड या साऱ्या जल प्रकल्पांचा लाभ जिल्ह्यातील सामान्य शेतकरी आदिवासी शेतकऱ्यांना होताना दिसून येत नाही.

सर्वाधिक प्रकल्पग्रस्त पालघर जिल्ह्यात असतानाही इथल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून, मनोर-वाडा-भिवंडी रस्त्याची स्थिती बिकट आहे. नियोजन समितीने या रस्त्यावरून एकदा तरी प्रवास करून बघावा, असे आव्हान सांबरे यांनी दिले आहे. जिल्ह्यात एकही जिल्हा रुग्णालय नसून, वैद्यकीय महाविद्यालय नाही. कुपोषणाचा कित्येक वर्षांपासूनचा जिल्ह्यावरचा शाप पुसून काढण्यात इथल्या लोकप्रतिनिधींना आजही जमलेले नाही. त्यामुळे स्थलांतराच्या टक्केवारीच्या आकडा वाढतच चालल्याचे सांबरे यांचे म्हणणे आहे.

रुग्णांना जावे लागते गुजरात राज्यातआरोग्यसेवेला लाचखोरीचे, अधिक पैसे कमविण्याचे ग्रहण लागले असून, इथल्या रुग्णांना उपचारासाठी गुजरात राज्यात जावे लागते. दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना चिरीमिरीशिवाय प्रमाणपत्र मिळत नाही. जिल्ह्याच्या नियोजनबद्ध विकासाच्या आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक असते. परंतु जिल्हा नियोजन विभागाच्या कार्यालयातून टक्केवारीशिवाय कामेच होत नसल्याचे सांबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :palgharपालघर