शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

६०० कोटींचा निधी वापराविना परत; सुविधांपासून पालघरवासीय वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 23:53 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

हितेन नाईकपालघर : जिल्ह्याच्या निर्मितीपासून जिल्ह्यातून सुमारे ६०० कोटींचा निधी वापराविना परत गेला असून, आजपर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च करूनही जिल्ह्यातील आरोग्य, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून जिल्हावासीय वंचित राहात आहेत. इथली जनता, शेती आजही पाण्यापासून वंचित असून, कुपोषणाचा डाग पुसून काढण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नियोजन करण्याचे काम ज्या कार्यालयातून चालते, ते कार्यालयच टक्केवारीच्या गणितात अडकून पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी केली आहे.

पालघर जिल्हा शासनाच्या नकाशावर आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र आजही विकासापासून कोसो दूर आहे. मुंबईची तहान भागवण्याची क्षमता जिल्ह्यात असताना, ग्रामीण भागातील गरीब जनता आजही पाण्यापासून वंचित राहत आहे. डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी दगडधोंड्यांची वाट तुडवीत जाण्याचे दुर्भाग्य आजही त्यांच्या नशिबी आहे. जिल्ह्यातील धामणी सूर्या धरण, अप्पर वैतरणा, गारगाई, देहर्जे, लेंडी, खडखड या साऱ्या जल प्रकल्पांचा लाभ जिल्ह्यातील सामान्य शेतकरी आदिवासी शेतकऱ्यांना होताना दिसून येत नाही.

सर्वाधिक प्रकल्पग्रस्त पालघर जिल्ह्यात असतानाही इथल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून, मनोर-वाडा-भिवंडी रस्त्याची स्थिती बिकट आहे. नियोजन समितीने या रस्त्यावरून एकदा तरी प्रवास करून बघावा, असे आव्हान सांबरे यांनी दिले आहे. जिल्ह्यात एकही जिल्हा रुग्णालय नसून, वैद्यकीय महाविद्यालय नाही. कुपोषणाचा कित्येक वर्षांपासूनचा जिल्ह्यावरचा शाप पुसून काढण्यात इथल्या लोकप्रतिनिधींना आजही जमलेले नाही. त्यामुळे स्थलांतराच्या टक्केवारीच्या आकडा वाढतच चालल्याचे सांबरे यांचे म्हणणे आहे.

रुग्णांना जावे लागते गुजरात राज्यातआरोग्यसेवेला लाचखोरीचे, अधिक पैसे कमविण्याचे ग्रहण लागले असून, इथल्या रुग्णांना उपचारासाठी गुजरात राज्यात जावे लागते. दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना चिरीमिरीशिवाय प्रमाणपत्र मिळत नाही. जिल्ह्याच्या नियोजनबद्ध विकासाच्या आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक असते. परंतु जिल्हा नियोजन विभागाच्या कार्यालयातून टक्केवारीशिवाय कामेच होत नसल्याचे सांबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :palgharपालघर