शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

वसई-विरारमधून ५९५ जण बेपत्ता

By admin | Updated: July 11, 2016 01:46 IST

वसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत

शशी करपे ,  वसईवसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत. तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता झाल्याच्या अधिक तक्रारी दाखल झाल आहेत. यातील काही जणांचा शोध लागलेला असली तरी घरी परत आलेल्यांकडून पोलिसांना कळवले जात नसल्याने बेपत्तांबाबत ठोस माहिती उजेडात येणे कठीण बनत चालले आहे. वसई तालुक्यात विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपुर, वसई अशी सात पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५९५ जण गेल्या १८८ दिवसांत बेपत्ता झाले आहेत. तर १७४ जणांचे अपहरण करण्यात आल्याची नोंद झाली आहे. त्यात १४ ते १६ या वोगटातील मुली आणि मुलांचीही संख्या जास्त आहे. प्रेम प्रकरणातून यातील अधिक जण बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बेपत्ता प्रकरणातील काही गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे. तर काही बेपत्ता घरी परतत असतात. मात्र, परत आलेल्यांची माहिती पोलिसांना कळवली जात नसल्याने बेपत्ता असलेल्यांचा आकडा दरवर्षी मोठा होत जातो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर बहुतेक मुली प्रेमप्रकरणातूनच घरातून पळुन जात असल्याचे पहावास मिळत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. बेपत्ता आणि अपहरणची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या महिन्यात वसई विरारसाठी स्वतंत्र अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा सुरु करण्यात आली आहे.