शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमधून ५९५ जण बेपत्ता

By admin | Updated: July 11, 2016 01:46 IST

वसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत

शशी करपे ,  वसईवसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत. तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता झाल्याच्या अधिक तक्रारी दाखल झाल आहेत. यातील काही जणांचा शोध लागलेला असली तरी घरी परत आलेल्यांकडून पोलिसांना कळवले जात नसल्याने बेपत्तांबाबत ठोस माहिती उजेडात येणे कठीण बनत चालले आहे. वसई तालुक्यात विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपुर, वसई अशी सात पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५९५ जण गेल्या १८८ दिवसांत बेपत्ता झाले आहेत. तर १७४ जणांचे अपहरण करण्यात आल्याची नोंद झाली आहे. त्यात १४ ते १६ या वोगटातील मुली आणि मुलांचीही संख्या जास्त आहे. प्रेम प्रकरणातून यातील अधिक जण बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बेपत्ता प्रकरणातील काही गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे. तर काही बेपत्ता घरी परतत असतात. मात्र, परत आलेल्यांची माहिती पोलिसांना कळवली जात नसल्याने बेपत्ता असलेल्यांचा आकडा दरवर्षी मोठा होत जातो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर बहुतेक मुली प्रेमप्रकरणातूनच घरातून पळुन जात असल्याचे पहावास मिळत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. बेपत्ता आणि अपहरणची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या महिन्यात वसई विरारसाठी स्वतंत्र अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा सुरु करण्यात आली आहे.