शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:04 IST

नोटिसा बजावूनही रहिवाशांचा मुक्काम

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील ९ प्रभागांतील मिळून यंदा ५६३ धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली असून यातील १८० इमारती अतिधोकादायक म्हणून गणल्या आहेत.

महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. अशा इमारतींमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी अशा इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी दरवर्षी तयार केली जाते. यंदाही अशीच धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५६३ धोकादायक इमारतींपैकी १८० इमारती अतिधोकादायक बनलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरे रिकामी करण्याच्या किंवा धोकादायक असल्यास त्याला दुरुस्तीची नोटीस देण्यात येते. पालिकेतर्फे या १८० इमारतींना नोटिसा देऊनही रहिवासी त्याच इमारतीत बिनधास्तपणे वास्तव्य करत आहेत.

जुलैमध्ये नालासोपाऱ्यात एका अतिधोकादायक इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर पालिकेने संपूर्ण इमारत जमीनदोस्त केली. तर आॅगस्टमध्ये नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील चाळीचा पाया खचला होता. त्यामुळे संपूर्ण चाळ जमीनदोस्त झाली. या दोन्ही घटनांत वेळीच नागरिक बाहेर निघाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई-विरार शहरामधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दाट असल्याचे वसईतील सामाजिक कार्यकर्ते राज दासोनी यांनी सांगितले. महाड येथील इमारत दुर्घटनेत ८ ते १० वर्षे जुनी इमारत जमीनदोस्त झाली, मात्र वसईत असलेल्या जुन्या धोकादायक इमारती अतिशय जीर्ण झाल्या असून त्या रिकाम्या केल्या पाहिजे, असे मत वसईकर नागरिक व्यक्त करत आहेत.नागरिकांची मागणी : संक्रमण शिबिरे निर्माण करण्याचा निर्णय घ्यादरवर्षी वसई-विरार पालिका प्रशासन मोहीम सुरू करून धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र, यामुळे पालिकेच्या धोकादायक इमारतींत राहणाºया रहिवाशांसमोर दुसºया घराचा पेच निर्माण होतो. दुसरे घर घेणे परवडणारे नसल्यामुळे आणि समाधानकारक पर्याय नसल्याने जायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशा नागरिक व रहिवाशांसाठी संक्रमण शिबिराची व्यवस्थादेखील करण्यात आलेली नाही. ती केली तरी तात्पुरती असते, त्यामुळे रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत. दरवर्षी निर्माण होणाºया या परिस्थितीमुळे पालिकेने अशा धोकादायक इमारतींबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत वसईकरांनी व्यक्त केले आहे.वसई-विरार महापालिका हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील बहुतेक इमारतींमधील अनेक नागरिकांनी आपली घरे रिकामीदेखील केली आहेत.- गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार