शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:04 IST

नोटिसा बजावूनही रहिवाशांचा मुक्काम

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील ९ प्रभागांतील मिळून यंदा ५६३ धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली असून यातील १८० इमारती अतिधोकादायक म्हणून गणल्या आहेत.

महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. अशा इमारतींमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी अशा इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी दरवर्षी तयार केली जाते. यंदाही अशीच धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५६३ धोकादायक इमारतींपैकी १८० इमारती अतिधोकादायक बनलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरे रिकामी करण्याच्या किंवा धोकादायक असल्यास त्याला दुरुस्तीची नोटीस देण्यात येते. पालिकेतर्फे या १८० इमारतींना नोटिसा देऊनही रहिवासी त्याच इमारतीत बिनधास्तपणे वास्तव्य करत आहेत.

जुलैमध्ये नालासोपाऱ्यात एका अतिधोकादायक इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर पालिकेने संपूर्ण इमारत जमीनदोस्त केली. तर आॅगस्टमध्ये नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील चाळीचा पाया खचला होता. त्यामुळे संपूर्ण चाळ जमीनदोस्त झाली. या दोन्ही घटनांत वेळीच नागरिक बाहेर निघाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई-विरार शहरामधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दाट असल्याचे वसईतील सामाजिक कार्यकर्ते राज दासोनी यांनी सांगितले. महाड येथील इमारत दुर्घटनेत ८ ते १० वर्षे जुनी इमारत जमीनदोस्त झाली, मात्र वसईत असलेल्या जुन्या धोकादायक इमारती अतिशय जीर्ण झाल्या असून त्या रिकाम्या केल्या पाहिजे, असे मत वसईकर नागरिक व्यक्त करत आहेत.नागरिकांची मागणी : संक्रमण शिबिरे निर्माण करण्याचा निर्णय घ्यादरवर्षी वसई-विरार पालिका प्रशासन मोहीम सुरू करून धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र, यामुळे पालिकेच्या धोकादायक इमारतींत राहणाºया रहिवाशांसमोर दुसºया घराचा पेच निर्माण होतो. दुसरे घर घेणे परवडणारे नसल्यामुळे आणि समाधानकारक पर्याय नसल्याने जायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशा नागरिक व रहिवाशांसाठी संक्रमण शिबिराची व्यवस्थादेखील करण्यात आलेली नाही. ती केली तरी तात्पुरती असते, त्यामुळे रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत. दरवर्षी निर्माण होणाºया या परिस्थितीमुळे पालिकेने अशा धोकादायक इमारतींबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत वसईकरांनी व्यक्त केले आहे.वसई-विरार महापालिका हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील बहुतेक इमारतींमधील अनेक नागरिकांनी आपली घरे रिकामीदेखील केली आहेत.- गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार