शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:04 IST

नोटिसा बजावूनही रहिवाशांचा मुक्काम

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील ९ प्रभागांतील मिळून यंदा ५६३ धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली असून यातील १८० इमारती अतिधोकादायक म्हणून गणल्या आहेत.

महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. अशा इमारतींमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी अशा इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी दरवर्षी तयार केली जाते. यंदाही अशीच धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५६३ धोकादायक इमारतींपैकी १८० इमारती अतिधोकादायक बनलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरे रिकामी करण्याच्या किंवा धोकादायक असल्यास त्याला दुरुस्तीची नोटीस देण्यात येते. पालिकेतर्फे या १८० इमारतींना नोटिसा देऊनही रहिवासी त्याच इमारतीत बिनधास्तपणे वास्तव्य करत आहेत.

जुलैमध्ये नालासोपाऱ्यात एका अतिधोकादायक इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर पालिकेने संपूर्ण इमारत जमीनदोस्त केली. तर आॅगस्टमध्ये नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील चाळीचा पाया खचला होता. त्यामुळे संपूर्ण चाळ जमीनदोस्त झाली. या दोन्ही घटनांत वेळीच नागरिक बाहेर निघाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई-विरार शहरामधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दाट असल्याचे वसईतील सामाजिक कार्यकर्ते राज दासोनी यांनी सांगितले. महाड येथील इमारत दुर्घटनेत ८ ते १० वर्षे जुनी इमारत जमीनदोस्त झाली, मात्र वसईत असलेल्या जुन्या धोकादायक इमारती अतिशय जीर्ण झाल्या असून त्या रिकाम्या केल्या पाहिजे, असे मत वसईकर नागरिक व्यक्त करत आहेत.नागरिकांची मागणी : संक्रमण शिबिरे निर्माण करण्याचा निर्णय घ्यादरवर्षी वसई-विरार पालिका प्रशासन मोहीम सुरू करून धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र, यामुळे पालिकेच्या धोकादायक इमारतींत राहणाºया रहिवाशांसमोर दुसºया घराचा पेच निर्माण होतो. दुसरे घर घेणे परवडणारे नसल्यामुळे आणि समाधानकारक पर्याय नसल्याने जायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशा नागरिक व रहिवाशांसाठी संक्रमण शिबिराची व्यवस्थादेखील करण्यात आलेली नाही. ती केली तरी तात्पुरती असते, त्यामुळे रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत. दरवर्षी निर्माण होणाºया या परिस्थितीमुळे पालिकेने अशा धोकादायक इमारतींबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत वसईकरांनी व्यक्त केले आहे.वसई-विरार महापालिका हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील बहुतेक इमारतींमधील अनेक नागरिकांनी आपली घरे रिकामीदेखील केली आहेत.- गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार