शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

५० टन धान्याची विक्री

By admin | Updated: May 16, 2017 00:46 IST

ठाण्यात विविध ठिकाणी १० दिवस आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या संपूर्ण महोत्सवात तब्बल

लोकमत न्यूज ब्युरोठाणे : ठाण्यात विविध ठिकाणी १० दिवस आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या संपूर्ण महोत्सवात तब्बल ५० टन धान्याची विक्री झाली. या महोत्सवात सेंद्रिय तूरडाळीबरोबरच तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली, अशी माहिती आयोजकांनी दिली. ‘नाम फाउंडेशन’ आणि ‘संस्कार’ संस्थेमार्फत हा महोत्सव आयोजित केला होता. हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यांतून ३५० शेतकऱ्यांनी आपले धान्य येथे आणले होते. या शेतकऱ्यांचे २५ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी झाले. यात सेंद्रिय पद्धतीची ज्वारी, तूरडाळ, गहू, हरभरा, उडीद, बाजरी, हळद, चणाडाळ, मसाले, इंद्रायणी तांदूळ, बासमती तांदूळ, मूगडाळ, उडीदडाळ यांचा समावेश होता. १ मे ते ४ मे या कालावधीत गावदेवी मैदान येथे झालेल्या महोत्सवात २५ टन धान्याची विक्री झाली, तर आर्थिक उलाढाल जवळपास १२ लाखांची होती. त्यानंतर, ६ ते १० मे या कालावधीत माझी आई शाळा, पातलीपाडा येथे ९ टन धान्याची विक्री झाली, तर पाच ते सहा लाखांची उलाढाल झाली.ठाणेकरांच्या वाढत्या मागणीनुसार गावदेवी मैदानात ९ व १० मे रोजी पुन्हा धान्याचे स्टॉल्स लावण्यात आले, तर ११ व १२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हा महोत्सव भरवण्यात आला. शेवटच्या दिवसात १० टन धान्याची, तर संपूर्ण महोत्सवात ५० टन धान्याची विक्री झाल्याचे ‘संस्कार’ संस्थेचे आ. संजय केळकर यांनी सांगितले. धान्य महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे आणि त्याकरिता इतर संस्थांनीही पुढाकार घेतला पाहिजे. अशी भावना शिवराम घोडके यांनी व्यक्त केली.