शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

५ लाखांच्या खंडणीसाठी नालासोपा-यातून अपहरण, तीन खंडणीबहाद्दरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:59 IST

विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली.

विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली. नालासोपारा येथे राहणारे मनमीत उर्फ लकी सुचासिंग बाथ (३८) यांना त्यांचे पुणे येथील परिचयाचे हरिश चव्हाण (४२) याने जव्हार येथील आदिवासी समाज शैक्षणिक व सामाजिक संस्थेसाठी पाच लाख रुपयांची देणगी मागितली होती.२४ आॅक्टोबर २०१७ रोजी हरिश चव्हाणने मनमीत बाथ यांना पाच लाख रुपये घेऊन तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. हरिश चव्हाण परिचयाचा असल्याने बाथ आपल्या विनोद मिश्रा या मित्रासह हरिशला भेटण्यासाठी गेले होते. बाथ यांनी पाच लाख रुपये आणले नसल्याचे सांगताच संतापलेल्या हरिशने आपल्या साथीदारांसह बाथ आणि मिश्रा यांना मारहाण केली. त्यानंतर बाथ यांना एका गाडीत कोंबून त्यांचे अपहरण केले. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी बाथ यांची सुखरूप सुटका करतानाच खंडणीखोरांना अटक करण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर खैरनार यांनी पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली होती. त्यांनी प्रमुख आरोपी हरिश चव्हाण (४२, रा. कोथरूड), गजानन कवतीकर (२५, रा. बालेवाडी), समीर शेख (२५, रा. येरवडा) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.

टॅग्स :Kidnappingअपहरण