शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

रेल्वे अपघातात ४३ महिन्यांत ४८१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:23 IST

पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत.

संजु पवार ।विरार : पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत. त्यातील १४७ जणांच्या वारसांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. दरवाज्यात लटकणे, गर्दीच्या वेळी हात निसटून पडणे, आत्महत्या , चालुु गाडी पकडण्याचा प्रयत्न यासारख्या घटनांमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.सफाळे , केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणु रोड, बोर्डी, घोलवड या नऊ रेल्वे स्थांनका दरम्यान मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा सुरू झाली. क्षणार्धात वेग पकडणाºया लोकलचा अंदाज न आल्यानेही अपघात घडून प्रवाश्यांचा जीव गेला आहे. या परिसरात गेल्या ४३ महिन्यांमध्ये ४८१ अपघातात ठार झाले आहेत. यातील ३३४ मृत्युंचा छडा लाऊन पोलिसांनी मृतदेह वारसांच्या ताब्यात दिले आहेत. मात्र मृतांपैकी १४७ जणांची अद्याप ओळख न पटल्याने पेच वाढला आहे.वैतरणा परिसरातील रेल्वे खांब क्र.१६९/७ ते घोलवड परिसरातील रेल्वे खांब १३५/१७ दरम्यान हे सर्व अपघात घडून आले आहेत. दुसरीकडे, रेल्वेकडून खूपच कमी अनुदान मिळते. अनुदान वाढवून मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव मंजूरीसाठी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पी आय प्रमोद बाबर यांनी दिली.