शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपेने भरती केलेल्या ४४ जणांना ‘शो कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:32 IST

जिल्हा परिषद अंतर्गत सन २०१७ मधील अनुकंपा कर्मचारी भरती प्रक्रिये मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (अनियमतिता) झाल्याने संबंधिता विरोधात कारवाई होणार असल्याचे लोकमतचे वृत्त खरे ठरत आहे.

- हितेन नाईक पालघर : जिल्हा परिषद अंतर्गत सन २०१७ मधील अनुकंपा कर्मचारी भरती प्रक्रिये मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (अनियमतिता) झाल्याने संबंधिता विरोधात कारवाई होणार असल्याचे लोकमतचे वृत्त खरे ठरत असून नियुक्त उमेदवारांना तुमची नेमणूक रद्द करून सेवा संपुष्टात का आणण्यात येऊ नये अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकरांनी बजावली आहे.पालघर जिल्हा निर्मिती नंतर ठाणे जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीच्या यादी मधील ४९ कर्मचाऱ्यांच्या नेमणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पालघर जिल्हा परिषदे कडून घाईघाईने करण्यात आले होते. त्याच वेळी ठाणे जिल्हापरिषदेने मात्र अनुकंपा भरती प्रक्रिया टाळली होती. सामान्य प्रशासन विभागांतर्गत १० टक्के प्रमाणे नियमानुसार अवघ्या ५ जागा भरणे गरजेचे असतांना ह्या विभागाचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी ह्यांच्या सह अन्य अधिकाºयांच्या समितीने अधिक ४४ उमेदवारांची नियुक्ती केली होती. ह्या प्रकरणात प्रत्येक उमेदवारा कडून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. ह्या अनियमित भरती प्रक्रिये विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटीलांसह अनेकांनी स्थायी समितीत आवाज उठविला होता. ह्या प्रकरणी त्रिसदस्यीय कमिटी नियुक्त करण्यात आल्या नंतर तीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सुपूर्द केला होता.मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर ह्यांनी ३० नोव्हेंबर रोजी ह्या भरती केलेल्या ४९ उमेदवारांना एक पत्र पाठविले असून २०१७ मध्ये अनुकंपा भरती प्रक्रिये मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या स्थायी समिती मध्ये घेण्यात आलेल्या गंभीर आरोपा बाबत कळविले आहे.तुमची नेमणूक करतांना माहे जानेवारी २०१७ च्या रिक्त पदांच्या अनुषंगाने भरलेली पदे वित्त विभागाकडील २ जून २०१५ च्या शासन निर्णया नुसार रिक्त नसतांना पदांची भरती केलेली आहे. त्यामुळे जिप पालघरच्या सेवेत केलेली नेमणूक ही अतिरिक्त व नियमबाह्य असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तुम्हाला जिल्हा परिषद सेवेत दिलेले नेमणुकीचे आदेश रद्द करून तुमची सेवा संपुष्टात का आणण्यात येऊ नये? याचा खुलासा १५ डिसेंबर च्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास व तुमचे समाधानकारक उत्तर न आल्यास आदेश क्र. पाजिप/साप्रवी/आस्था ३ अ/वशी च्या आदेशान्वये जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेली नेमणूक रद्द करून सेवा समाप्त करण्यात येईल ह्याची नोंद घेण्या बाबत कळविले आहे.>त्या अधिकाºयांवर कारवाई होणार?नियमबाह्य पद्धतीने भरती केलेल्या कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा जरी जिल्हा परिषदेने उचलला असला तरी ह्या भरती प्रक्रि ये मधून कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणाºया अन्य मोठ्या अधिकाºयांविरोधात मुख्याधिकारी काय कारवाई करतात ह्या कडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.