शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

४२२५० हेक्टरवर भातलागवड !

By admin | Updated: August 3, 2015 03:41 IST

आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणे अपेक्षित होते. परंतु, पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के म्हणजे

सुरेश लोखंडे, ठाणेआतापर्यंत अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणे अपेक्षित होते. परंतु, पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के म्हणजे ४२ हजार २५० हेक्टरवर भातलागवड करण्यात आली असून उर्वरित सुमारे ३५ टक्के क्षेत्रावरची लागवड या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी लोकमतला सांगितले. संततधार पाऊस सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात केवळ ३ टक्के म्हणजे एक हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली होती. पण, आठवडाभरात पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीस प्रारंभ केला आहे. यामुळे आतापर्यंत ६५ टक्के शेतांवर भातलागवड पूर्ण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. उर्वरित ३५ टक्के म्हणजे २२ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरील लागवड विलंबाने होणार असली तरी उत्पादनात फारशी घट होणार नसल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील प्र्रतिहेक्टरी २४०० ते २५०० क्विंटल भात उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यासाठी लागणाऱ्या सुमारे ६४३० मेट्रीक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. यामध्ये पाच हजार ५४७ मेट्रीक टन युरियासह १४ हजार किलो फोरेट खताचादेखील समावेश आहे. या भातलागवडीसाठी पाच हजार ७०० हेक्टरवरील नर्सरीत भाताची रोपे तयार करण्यात आलेली आहेत.