शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ठेकेदाराकडून एकाच वेळी चार-चार महिन्यांचे ‘पोषण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:04 IST

तांदळात अळ्या, कडधान्याला कीड; शिक्षक- बचत गट हैराण

- रवींद्र साळवे 

मोखाडा : तालुकाच नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र असून, वाहतुकीचा खर्च वाचविण्यासाठी पोषण आहारातील कच्च्या मालाचा पुरवठा एक किंवा दोन महिन्याचा करावयाचा सोडून शाळांना मात्र तीन ते चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच केला जातो. यामुळे कालांतराने तांदळात जाळ्या होतात, हरभरा-वाटाणे हे कडधान्य आतून किडलेले असते. यामुळे विद्यार्थ्यांना हे धान्य शिजवून देताना शिक्षक आणि बचतगटांची चांगलीच पंचाईत होताना दिसत आहे. 

प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला सांभाळून घेतात. त्यामुळे शिक्षकही तक्रार कोठे करावी आणि अधिकारी वर्गाचा रोष कसा पत्करायचा, या विवंचनेत असल्यामुळे हा पुरवठ्याचा घोळ राजरोसपणे सुरूच आहे. यामुळे नियमाला धरून धान्य न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नमध्यान्ह भोजन योजनेसाठी पोषण आहाराचा पुरवठा होत असतो. यामध्ये तांदूळ, तेल, हरभरा, वाटाणा यासोबतच अनेक मसाले पाकीट वगैरे धान्यांचा पुरवठा होतो, मात्र या पुरवठ्याबाबत अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच अडचणींचा पाडा मांडला.

प्रमाणित वजनकाट्याऐवजी हातकाट्याचा वापर

    तांदूळ कधीच मोजून दिला जात नाही, मात्र प्रत्येक गोणीत तांदूळ हा अपेक्षित वजनापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. याशिवाय बाकी धान्य मोजण्यासाठी प्रमाणित केलेले वजनकाटे न वापरता थेट हातकाट्याचा वापर केला जातो. यामुळे बाकी धान्याच्याही मापात पाप होत असल्याचे निर्दशनास आले आहे. 

    धान्याचा पुरवठा शासन नियमांनुसार दर १ किंवा २ महिन्याला करावयाचा असतो. त्यासाठीची तरतूदही शासन करत असते, मात्र संबंधित ठेकेदार आपल्या वाहतुकीचे पैसे वाचावेत म्हणून जवळपास तीन-चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच करून मोकळा होतो. यामुळे कालांतराने या धान्याला कीड लागते, अशा तक्रारी आहेत. 

शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी शिक्षकांना आवाहन करतो की, महिन्याचा माल घ्यावा, धान्य दर्जा आणि वजन बघूनच माल स्वीकारावा. तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. थेट माझ्याकडे तक्रारी केल्या तरी चालतील.- प्रकाश निकम, अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद

टॅग्स :palgharपालघर