शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

सूर्या-धामणी धरणांत ३२.६२ टक्के पाणीसाठा; वसईकरांची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:17 AM

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या किमान काही महिने भेडसावणार नाही,

आशीष राणे

वसई : जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वसईतील उसगाव व पेल्हार या दोन धरणांतील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे, मात्र वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालघरमधील सूर्या-धामणी धरणांत अद्यापही ३२.६२ टक्के पाणीसाठा असल्याने वसई-विरारकरांना पाणीबाणीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. सूर्या-धामणी धरणातील पाणीसाठा वर्षभर तरी पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी ‘लोकमत’ला दिली.

वसई-विरारला पाणीपुरवठा करणारे सूर्या-धामणी हे मुख्य धरण वगळता उसगाव आणि पेल्हार या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्याची पातळी कमी झाल्याने यंदा पाणीकपात केली जाणार का, याबाबत आयुक्त आणि उपअभियंता पाणीपुरवठा सुरेंद्र ठाकरे यांना संपर्क केला असता तो झाला नाही. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून १०० एमएलडी, तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता जून महिना संपत आला तरी वरुणराजाने अल्प हजेरी लावल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

गतवर्षी पडलेल्या पावसाच्या धरणातील पाण्याचा साठा आता खालावत चालला आहे. जिल्ह्यातील तीन धरणांपैकी पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६..३५ घनमीटर दशलक्ष लिटर (९०.१४१ दशलक्ष) म्हणजेच ३२.६२ टक्के तर वसई तालुक्यातील उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष (०.५६२ दशलक्ष), ११.३३ टक्के आणि पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर (०.११८ दशलक्ष ) म्हणजेच ३.३१ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

जून महिना संपला तरी पावसाने जोरदार हजेरी न लावल्यामुळे वसई-विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पुढील काही दिवसात पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे सूर्या-धामणी धरणातील पाण्याचा विचार करून वसई-विरार शहरात कुठेही पाणीकपात केली जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.पाणीपुरवठा विभागाचे नागरिकांना आवाहनवसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या किमान काही महिने भेडसावणार नाही, इतका साठा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनीदेखील पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.धरणात असलेल्या पाण्याच्या पातळीनुसार धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत महापालिकेला अतिशय काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. सूर्याच्या दोन्ही योजनांतून २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असून तो साधारण ३६५ दिवस पुरेल, तर उसगाव धरणातून २० तर पेल्हारमधून १० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत आहे. यात उसगाव धरणात १८ दिवस, तर पेल्हार धरणात ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार