शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जिल्ह्यात ३१४ शेततळी

By admin | Updated: February 22, 2017 06:01 IST

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ३१४ शेततळ्यासाठी

हितेन नाईक / पालघरसिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ३१४ शेततळ्यासाठी २ कोटी ६० लाखाचे अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षासाठी १ हजार ४२९ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले आहेत.हा जिल्हा शेतीप्रधान असून त्याचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ६९ हजार ६९९ हेक्टर इतके आहे.भात, नागली, तूर, उडीद,मूग,खुरसानी याची १ लाख ४ हजार १०२ हेक्टरवर लागवड होते. रब्बी पेरणी ५ हजार ७४३ हेक्टरवर होते.तर रब्बी भाजीपाला लागवडी खाली ४ हजार ४६८ हेक्टरचे क्षेत्र होते. मागच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी लाखो हेक्टर क्षेत्र लागवडी पासून वंचित रहात असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील विक्र मगड,जव्हार,मोखाडा या आदिवासी बहुल डोंगराळ क्षेत्रात सिंचनाचे प्रमाण कमी आहे.त्यामुळे पावसाळ्यातील भातशेती नंतर हा सर्व भाग ओसाड आणि सुकून जातो. पावसाचे पाणी साठविण्याची योग्य सोय नसल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून जाते व रब्बी उन्हाळी लागवडीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने आपल्या ओसाड पडलेल्या जमिनी सोडून इथला भूमिपुत्र रोजगाराच्या शोधार्थ शहराकडे धाव घेतो.पावसात पडलेला खंड व पाण्याच्या टंचाई मुळे पिकांचे नुकसान होऊ नये तसेच रब्बी उन्हाळी हंगामात संरक्षित सिंचन देऊन कडधान्य व भाजीपाला पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास शेततळे हा चांगला पर्याय ठरत असल्याने मागेल त्याला शेततळे हि योजना राबविण्यात आली . तसेच आत्मा योजनेंतर्गत खोदलेल्या शेततळ्यात मत्स्यपालनासाठी रोहू, कटला, मृगल ई. मत्स्यबीज ही पुरविले जाते.उद्दिष्ट ५०० शेततळ्यांचेशेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या सामूहिक शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात ५०० शेततळे उभारण्याचे टार्गेट देण्यात आले असून शेततळ्यामुळे सिंचनात वाढ होऊन शेतकरी आता वेलवर्गीय भाज्याबरोबर टॉमॅटो, वांगी, मुळा, कोबी इ. उत्पादन घेऊ लागल्याने आता पालघर तालुक्यातून २१५ अर्ज,जव्हार १६९, तलासरी ७०, मोखाडा १६५, वाडा ३२४, डहाणू २६९, विक्रमगड १८४ तर वसई ३३ असे एकूण १ हजार ४२९ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राजेश्वर पाटील ह्यांनी लोकमतला दिली.त्यामुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना आणि मागेल त्याला शेततळे च्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षित्रय आणि जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केल्या नंतर समाधान व्यक्त केले होते.त्यामुळे येत्या काही वर्षात सिंचनाचे प्रमाण वाढून शेतकर्यांच्या हाताला नक्कीच चांगला रोजगार मिळेल असा विश्वास कृषी अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.लाभार्थी निवडीचे निकष :शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी.लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळयासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.दारिद्र्य रेषेखालील,आत्महत्याग्रस्त कुटुंबास प्राधान्य आवश्यक कागदपत्रेजमिनीचा ७/१२ व ८ अ चा उतारादारिद्र्य रेषेखालील असल्यास कार्डबॅंक खाते तपशीलआधार कार्ड