शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३१४ शेततळी

By admin | Updated: February 22, 2017 06:01 IST

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ३१४ शेततळ्यासाठी

हितेन नाईक / पालघरसिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ३१४ शेततळ्यासाठी २ कोटी ६० लाखाचे अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षासाठी १ हजार ४२९ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले आहेत.हा जिल्हा शेतीप्रधान असून त्याचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ६९ हजार ६९९ हेक्टर इतके आहे.भात, नागली, तूर, उडीद,मूग,खुरसानी याची १ लाख ४ हजार १०२ हेक्टरवर लागवड होते. रब्बी पेरणी ५ हजार ७४३ हेक्टरवर होते.तर रब्बी भाजीपाला लागवडी खाली ४ हजार ४६८ हेक्टरचे क्षेत्र होते. मागच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी लाखो हेक्टर क्षेत्र लागवडी पासून वंचित रहात असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील विक्र मगड,जव्हार,मोखाडा या आदिवासी बहुल डोंगराळ क्षेत्रात सिंचनाचे प्रमाण कमी आहे.त्यामुळे पावसाळ्यातील भातशेती नंतर हा सर्व भाग ओसाड आणि सुकून जातो. पावसाचे पाणी साठविण्याची योग्य सोय नसल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून जाते व रब्बी उन्हाळी लागवडीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने आपल्या ओसाड पडलेल्या जमिनी सोडून इथला भूमिपुत्र रोजगाराच्या शोधार्थ शहराकडे धाव घेतो.पावसात पडलेला खंड व पाण्याच्या टंचाई मुळे पिकांचे नुकसान होऊ नये तसेच रब्बी उन्हाळी हंगामात संरक्षित सिंचन देऊन कडधान्य व भाजीपाला पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास शेततळे हा चांगला पर्याय ठरत असल्याने मागेल त्याला शेततळे हि योजना राबविण्यात आली . तसेच आत्मा योजनेंतर्गत खोदलेल्या शेततळ्यात मत्स्यपालनासाठी रोहू, कटला, मृगल ई. मत्स्यबीज ही पुरविले जाते.उद्दिष्ट ५०० शेततळ्यांचेशेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या सामूहिक शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यात ५०० शेततळे उभारण्याचे टार्गेट देण्यात आले असून शेततळ्यामुळे सिंचनात वाढ होऊन शेतकरी आता वेलवर्गीय भाज्याबरोबर टॉमॅटो, वांगी, मुळा, कोबी इ. उत्पादन घेऊ लागल्याने आता पालघर तालुक्यातून २१५ अर्ज,जव्हार १६९, तलासरी ७०, मोखाडा १६५, वाडा ३२४, डहाणू २६९, विक्रमगड १८४ तर वसई ३३ असे एकूण १ हजार ४२९ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राजेश्वर पाटील ह्यांनी लोकमतला दिली.त्यामुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना आणि मागेल त्याला शेततळे च्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षित्रय आणि जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केल्या नंतर समाधान व्यक्त केले होते.त्यामुळे येत्या काही वर्षात सिंचनाचे प्रमाण वाढून शेतकर्यांच्या हाताला नक्कीच चांगला रोजगार मिळेल असा विश्वास कृषी अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.लाभार्थी निवडीचे निकष :शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी.लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळयासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.दारिद्र्य रेषेखालील,आत्महत्याग्रस्त कुटुंबास प्राधान्य आवश्यक कागदपत्रेजमिनीचा ७/१२ व ८ अ चा उतारादारिद्र्य रेषेखालील असल्यास कार्डबॅंक खाते तपशीलआधार कार्ड