शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

पालघर मंडळात कृषीपंपांचे ३ कोटी थकीत, ‘कृषी संजीवनी’ची होणार अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:27 IST

कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही.

कल्याण : कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही. त्यापैकी पालघर मंडळात ८२३९ पंपधारकांकडे सर्वाधिक म्हणजे ३.३९ कोटींची थकबाकी आहे. ही माहिती महावितरणने दिली आहे.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकबाकी कृषी ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाच समान हप्त्यांत वीजबिलाची थकबाकी भरण्याची संधी आहे. मूळ थकबाकीच्या रकमेवरील व्याज व दंड माफ केला जाणार आहे. एप्रिल ते जून २०१७ चे वीजबिल भरून या योजनेत सहभागी होता येईल. मार्च २०१७ अखेरीस असलेली थकबाकी मूळ रक्कम पाच त्रैमासिक हप्त्यांत भरता येईल. वेळेवर हप्ते दिल्यास व्याज व दंड माफ केला जाणार आहे. हप्ते वेळेवर न भरल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. कल्याण परिमंडळात कल्याण, दिवा, मुंब्रा, कळवा, वसई, विरार, शहापूर, पालघर, अलिबाग, पेण, पनवेल, मुरबाड इतका मोठा परिसर येतो. कल्याण परिमंडळातील ३८ हजार ८५५ शेतकºयांना कृषीपंपासाठी जोडणी देण्यात आली होती. इच्छुकांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी केले आहे.पालघर मंडळात ८२३९ थकबाकीदारपालघर मंडळात एकूण १३ हजार ९४ कृषीपंपग्राहक आहेत. त्यापैकी आठ हजार २३९ ग्राहकांकडे ३ कोटी ३९ लाख रु पयांची थकबाकी आहे.वसई मंडळात ५ हजार ८३ कृषीपंपग्राहक असून त्यापैकी ३ हजार २२ ग्राहकांकडे एक कोटी ४४ लाख रु पयांची थकबाकी आहे.कल्याण मंडळ-२ अंतर्गत एकूण ४ हजार ३४१ ग्राहक असून त्यापैकी दोन हजार ७७७ ग्राहकांकडे एक कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. कल्याण मंडळ-१ अंतर्गत ५२ ग्राहक असून त्यापैकी ३७ ग्राहक हे थकबाकीदारआहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार