शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते, पण काळाने गाठले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:32 IST

२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर बालबाल बचावले होते.

वसई : २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या भीषण हल्ल्यातून नशिबाने वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले भीषण अपघाताचे बुधवारी बळी ठरले.वसई पूर्वेला मुंबई - अहमदाबाद महामार्गावर सातिवली पुलाजवळ मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉ. थॉमस उलेदर यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या अपघातात त्यांची दोन मुले देखील मृत्यू पावली असून पत्नी मात्र रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.नायगांव येथे राहणारे डॉ.थॉमस उलेदर हे पत्नी मेरी, १० वर्षाचा मुलगा बेनी आणि दुसरा ५ वर्षाचा मुलगा इझायल यांच्यासह एका कार्यक्र मासाठी गाडीने विरारला नातेवाईकाकडे जात होते. गुजरात लेनवर जाताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, गाडी मुंबईच्या लेनवर येऊन पडली आणि तेथे त्यांना दुसºया टेम्पोने उडविले. त्यात हे मृत्युमुखी पडले.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचले होते डॉ.थॉमस२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर बालबाल बचावले होते. आपल्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी ते कामा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळेस डॉ. थॉमस उलेदर सोबत त्यांचे भाउजी आणि मित्र ही होते. त्या तिघांना दहशतवादी कसाब व अब्बू इस्माइल याने बंधक बनवलं होतं. मात्र त्यातून हे तिघे आश्चर्यकारकरित्या वाचले .मंगळवारी उशिरा घडलेल्या या भीषण अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. डॉ.थॉमस उलेदर हे नायगांव येथील सिटीझन कॉलनीत राहत होते. या दुर्देवी घटनेनंतर सध्या वसई नायगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार