शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते, पण काळाने गाठले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:32 IST

२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर बालबाल बचावले होते.

वसई : २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या भीषण हल्ल्यातून नशिबाने वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले भीषण अपघाताचे बुधवारी बळी ठरले.वसई पूर्वेला मुंबई - अहमदाबाद महामार्गावर सातिवली पुलाजवळ मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉ. थॉमस उलेदर यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या अपघातात त्यांची दोन मुले देखील मृत्यू पावली असून पत्नी मात्र रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.नायगांव येथे राहणारे डॉ.थॉमस उलेदर हे पत्नी मेरी, १० वर्षाचा मुलगा बेनी आणि दुसरा ५ वर्षाचा मुलगा इझायल यांच्यासह एका कार्यक्र मासाठी गाडीने विरारला नातेवाईकाकडे जात होते. गुजरात लेनवर जाताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, गाडी मुंबईच्या लेनवर येऊन पडली आणि तेथे त्यांना दुसºया टेम्पोने उडविले. त्यात हे मृत्युमुखी पडले.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचले होते डॉ.थॉमस२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर बालबाल बचावले होते. आपल्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी ते कामा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळेस डॉ. थॉमस उलेदर सोबत त्यांचे भाउजी आणि मित्र ही होते. त्या तिघांना दहशतवादी कसाब व अब्बू इस्माइल याने बंधक बनवलं होतं. मात्र त्यातून हे तिघे आश्चर्यकारकरित्या वाचले .मंगळवारी उशिरा घडलेल्या या भीषण अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. डॉ.थॉमस उलेदर हे नायगांव येथील सिटीझन कॉलनीत राहत होते. या दुर्देवी घटनेनंतर सध्या वसई नायगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार