शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

रेल्वे अपघातात वर्षभरात २४४ बळी

By admin | Updated: January 11, 2017 06:09 IST

वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले.

विरार : वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले. यामध्ये ३० महिला आणि ८० बेवारसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटते आहे.वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड भार्इंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीतून पडणे, गाडीत चढत असताना निसटून पडणे, टपावरून प्रवास करतांना शॉक लागणे, गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करतांना पोलला धडकून पडणे या सारख्या घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होत असतो. विरार, नालासोपारा आणि वसई रेल्वे स्टेशनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडले आहेत.मीरा रोड ते वैतरणा या रेल्वे स्टेशनच्या ३५ कि.मी.च्या अंतरात २०१४ या सालात ३०५ अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये १७६ पुरूष आणि २६ स्त्रीयांची ओळख पटली होती. उर्वरित ९१ पुरूष आणि १२ स्त्रीयांची ओळखच पटली नसल्याने बेवारस मृतांचा आकडा १०३ होता. २०१५ या सालामध्ये एकूण २६४ जणांचे बळी गेले. त्यात मीरारोड येथे २०, भाईंदरमध्ये ४३ , नायगावमध्ये ११, वसईत ५५, नालासोपारा येथे -५७, विरारमध्ये -७३ आणि वैतरणा परिसरातील चार जणांचा समावेश आहे. ७३ जणांची ओळख पटली नव्हती.जानेवारी-डिसेंबर २०१६ मध्ये मीरारोड-२५,भाईंदर-३७, नायगाव-१४, वसई-३८,नालासोपारा-४४, विरार-८१, वैतरणा-५ असे मिळून २४४ जण मृत्यूमुखी पडले होते. मृतांमध्ये ३० महिलांचा समावेश होता. मृतांपैकी १६४ जणांची ओळख पटली होती. तर ८० बेवारस होते.गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून रेल्वे अपघातात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या घटलेली दिसून येते. २०१४ मध्ये ३०५ मृत्यूमुखी पडले होते. २०१५ मध्ये त्यात घट झाली होती. २०१५ वर्षी मृतांची संख्या २६४ होती. तर गेल्या वर्षी २४४ जणांचा मृत्यू झाला होता. वैतरणा ते मीरा रोड दरम्यान प्रत्येक स्टेशनवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने स्टेशन परिसरात भिंती बांधल्या आहेत. त्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांचे रस्ते बंद होऊ लागले आहेत. तसेच रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. परिणामी अपघातात घट होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.प्रवास करताना स्वत:ची काळजी घेतल्यास अपघाती मृत्युंपासून बचाव होऊ शकतो. प्रवाशांनी जीन्यांचा वापर करून सुविधांचा वापर केला पाहिजे. जलद प्रवासाच्या नादात प्रवाशी आपला जीव गमावत आहेत. यासाठी प्रवासी संघटनांनी जनजागृती मोहिम हाती घेतली पाहिजे. - महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक