शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातात वर्षभरात २४४ बळी

By admin | Updated: January 11, 2017 06:09 IST

वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले.

विरार : वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले. यामध्ये ३० महिला आणि ८० बेवारसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटते आहे.वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड भार्इंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीतून पडणे, गाडीत चढत असताना निसटून पडणे, टपावरून प्रवास करतांना शॉक लागणे, गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करतांना पोलला धडकून पडणे या सारख्या घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होत असतो. विरार, नालासोपारा आणि वसई रेल्वे स्टेशनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडले आहेत.मीरा रोड ते वैतरणा या रेल्वे स्टेशनच्या ३५ कि.मी.च्या अंतरात २०१४ या सालात ३०५ अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये १७६ पुरूष आणि २६ स्त्रीयांची ओळख पटली होती. उर्वरित ९१ पुरूष आणि १२ स्त्रीयांची ओळखच पटली नसल्याने बेवारस मृतांचा आकडा १०३ होता. २०१५ या सालामध्ये एकूण २६४ जणांचे बळी गेले. त्यात मीरारोड येथे २०, भाईंदरमध्ये ४३ , नायगावमध्ये ११, वसईत ५५, नालासोपारा येथे -५७, विरारमध्ये -७३ आणि वैतरणा परिसरातील चार जणांचा समावेश आहे. ७३ जणांची ओळख पटली नव्हती.जानेवारी-डिसेंबर २०१६ मध्ये मीरारोड-२५,भाईंदर-३७, नायगाव-१४, वसई-३८,नालासोपारा-४४, विरार-८१, वैतरणा-५ असे मिळून २४४ जण मृत्यूमुखी पडले होते. मृतांमध्ये ३० महिलांचा समावेश होता. मृतांपैकी १६४ जणांची ओळख पटली होती. तर ८० बेवारस होते.गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून रेल्वे अपघातात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या घटलेली दिसून येते. २०१४ मध्ये ३०५ मृत्यूमुखी पडले होते. २०१५ मध्ये त्यात घट झाली होती. २०१५ वर्षी मृतांची संख्या २६४ होती. तर गेल्या वर्षी २४४ जणांचा मृत्यू झाला होता. वैतरणा ते मीरा रोड दरम्यान प्रत्येक स्टेशनवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने स्टेशन परिसरात भिंती बांधल्या आहेत. त्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांचे रस्ते बंद होऊ लागले आहेत. तसेच रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. परिणामी अपघातात घट होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.प्रवास करताना स्वत:ची काळजी घेतल्यास अपघाती मृत्युंपासून बचाव होऊ शकतो. प्रवाशांनी जीन्यांचा वापर करून सुविधांचा वापर केला पाहिजे. जलद प्रवासाच्या नादात प्रवाशी आपला जीव गमावत आहेत. यासाठी प्रवासी संघटनांनी जनजागृती मोहिम हाती घेतली पाहिजे. - महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक