शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

रेल्वे अपघातात वर्षभरात २४४ बळी

By admin | Updated: January 11, 2017 06:09 IST

वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले.

विरार : वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या सात रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात गेल्या वर्षभरात २४४ जणांचे बळी गेले. यामध्ये ३० महिला आणि ८० बेवारसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटते आहे.वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड भार्इंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीतून पडणे, गाडीत चढत असताना निसटून पडणे, टपावरून प्रवास करतांना शॉक लागणे, गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करतांना पोलला धडकून पडणे या सारख्या घटनांमध्ये प्रवाशांचा मृत्यू होत असतो. विरार, नालासोपारा आणि वसई रेल्वे स्टेशनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडले आहेत.मीरा रोड ते वैतरणा या रेल्वे स्टेशनच्या ३५ कि.मी.च्या अंतरात २०१४ या सालात ३०५ अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये १७६ पुरूष आणि २६ स्त्रीयांची ओळख पटली होती. उर्वरित ९१ पुरूष आणि १२ स्त्रीयांची ओळखच पटली नसल्याने बेवारस मृतांचा आकडा १०३ होता. २०१५ या सालामध्ये एकूण २६४ जणांचे बळी गेले. त्यात मीरारोड येथे २०, भाईंदरमध्ये ४३ , नायगावमध्ये ११, वसईत ५५, नालासोपारा येथे -५७, विरारमध्ये -७३ आणि वैतरणा परिसरातील चार जणांचा समावेश आहे. ७३ जणांची ओळख पटली नव्हती.जानेवारी-डिसेंबर २०१६ मध्ये मीरारोड-२५,भाईंदर-३७, नायगाव-१४, वसई-३८,नालासोपारा-४४, विरार-८१, वैतरणा-५ असे मिळून २४४ जण मृत्यूमुखी पडले होते. मृतांमध्ये ३० महिलांचा समावेश होता. मृतांपैकी १६४ जणांची ओळख पटली होती. तर ८० बेवारस होते.गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून रेल्वे अपघातात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या घटलेली दिसून येते. २०१४ मध्ये ३०५ मृत्यूमुखी पडले होते. २०१५ मध्ये त्यात घट झाली होती. २०१५ वर्षी मृतांची संख्या २६४ होती. तर गेल्या वर्षी २४४ जणांचा मृत्यू झाला होता. वैतरणा ते मीरा रोड दरम्यान प्रत्येक स्टेशनवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने स्टेशन परिसरात भिंती बांधल्या आहेत. त्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांचे रस्ते बंद होऊ लागले आहेत. तसेच रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. परिणामी अपघातात घट होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.प्रवास करताना स्वत:ची काळजी घेतल्यास अपघाती मृत्युंपासून बचाव होऊ शकतो. प्रवाशांनी जीन्यांचा वापर करून सुविधांचा वापर केला पाहिजे. जलद प्रवासाच्या नादात प्रवाशी आपला जीव गमावत आहेत. यासाठी प्रवासी संघटनांनी जनजागृती मोहिम हाती घेतली पाहिजे. - महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक