शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

कारवाईच्या भीतीने १७ उद्योग बंद?; तारापूरच्या उद्योगांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:10 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी

पंकज राऊतबोईसर : राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या कमिटीच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकामार्फत तारापूर येथील उद्योगांची तपासणी (सर्व्हेक्षण ) सुरू करताच कारवाईच्या भीतीने १७ उद्योग बंद ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे उद्योग निश्चित का बंद केले आहेत, त्याचा पारदर्शकपणे तपास करण्याची मागणी आता होत आहे.

तारापूर येथे सर्व्हेक्षणाला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील एकूण १८ अधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत, तर एनजीटीच्या समितीच्या आदेशानुसार १५ डिसेंबरपर्यंत सर्व्हे सुरू राहणार असून १२१६ उद्योगांपैकी आतापर्यंत १४८ उद्योगांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्यामध्ये तारापूरमधील १७ उद्योग बंद आढळले आहेत. याचप्रमाणे दर १५ दिवसांनी ही कमिटी कामाचा आढावा घेत असून १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत पाच बैठका घेण्यात आल्या आहेत.तपासणी पथक येणार म्हणून उद्योजकांचे धाबे दणाणले असून उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अपेक्षित क्षमतेची नसल्याने या तपासणीला सामोरे जाण्याऐवजी अनेक उद्योगांनी अशा तपासणीच्या काळात उत्पादन मर्यादित ठेवण्याचे व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली उद्योग बंदच्या पर्यायाबरोबरच प्रदूषण करणारी उत्पादने थांबविल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे परीक्षण करताना नेमके प्रदूषण काय आणि कुठे होत आहे हे तपासणी यंत्रणा कसे शोधणार? असा सवाल केला जात आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिले म्हणून थातूरमातूर तपास करून काहीही निष्पन्न होणार नसून कारवाईच्या भीतीने जर उद्योग बंद केले गेले असतील, तर एनजीटीसारख्या न्यायव्यवस्थेच्या आदेशाचा अवमान केल्यासारखे होईल म्हणून तपासणी मोहिमेदरम्यान हे उद्योग का बंद केले आहेत, त्यादृष्टीनेही तपास करून अहवाल पाठवणे गरजेचे आहे.

...तर दोषी उद्योगांवर होणार कारवाईउद्योगांमधील रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन तपासले जात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तारापूर येथे ५० एमएलडी क्षमतेच्या नवीन सीईपीटीच्या प्रयोगशाळेत त्याचे पृथक्करण करून जलप्रदूषणाबरोबरच हवेचे प्रमाण मापदंडकानुसार कमी व जास्त आढळेल, त्या दोषी उद्योगांवर नोटिसी बजावून कारवाई करण्यात येणार आहे.