शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

वसई-विरारमध्ये ११२७ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 02:34 IST

दोघांचा मृत्यू : दिवसभरात २२३ नवीन रुग्ण

वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी तब्बल ११२७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे. दरम्यान, दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून २२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १२,५७३ वर पोहोचली आहे. वसई-विरार महापालिका परिसरामध्ये सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक ११२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्याच वेळी दिवसभरात २२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई ८५, वसई-विरार-३, नायगाव-६, नालासोपारा-६२ आणि विरार- ६७ रुग्ण आढळले आहेत. यात १३६ पुरुष आणि ६२ महिला रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, शहरात ११२७ रुग्ण घरी परतल्यामुळे आजवर मुक्त रुग्णांची संख्या ९ हजार २३३ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर शहरात एकूण ३ हजार ८४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत, तर सोमवारी वसई आणि विरार येथील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आजवर पालिका हद्दीतील २५६ रुग्णांनी या जीवघेण्या आजारात आपला जीव गमावला आहे.

जव्हारमध्ये कोरोना नियंत्रणातजव्हार : जव्हार तालुक्यात मागील दहा दिवसांपासून कोरोनाचा आकडा शून्य असून १ व २ आॅगस्ट रोजी प्रत्येकी एक, तर ३ आॅगस्ट रोजी ३ नवीन रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील भुरीटेक गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

२१ जुलै रोजी ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते, त्यानंतर सलग ९ दिवस एकही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली नाही. ३ आॅगस्टपर्यंत फक्त सात रुग्ण उपचार घेत असून १७० रुग्ण बरे झालेले आहेत, तसेचदोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.जून व जुलै महिन्यात कोरोनाचा कहर जव्हार शहरात बघावयास मिळाला होता. एका-एका दिवसात ३० ते ३५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत होती. हा आकडा १७९ पर्यंत पोहोचला आहे.दरम्यान, यातील ९५ टक्के रुग्ण अस्मिटोमॅटिक होते. त्यामुळे आरोग्य विभागाला लवकरच या कोरोना- बाधित रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल