शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वसईत वर्षभरात १ हजार १९४ कुटुंब बेपत्ता

By admin | Updated: January 13, 2016 00:29 IST

तुळींज पोलीस ठाण्यात एका महिन्यात तीन कुटुंबातील १५ जण गायब झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात वसई तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मिळून

- शशी करपे,  वसईतुळींज पोलीस ठाण्यात एका महिन्यात तीन कुटुंबातील १५ जण गायब झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात वसई तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मिळून १ हजार १९४ जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. विशेष म्हणजे तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ३२२ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहे. यातील अनेक बेपत्तांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. गेल्या महिन्यात मोरेगावातील सात जणांचे इगवे कुुटुंब अचानक गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे हे कुुटुंब नऊ महिन्यांपासून बेपत्ता असतानाही त्यांच्या नातेवाईकांनी तुळींज पोलिसांकडे डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली. इगवे कुुटुंब ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय करतात. या कुटुंबात तीन पुरुष, तीन महिला आणि एका दहा महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. या कुटुंबांचा अद्याप शोध लागलेला नाही.इगवे कुटुंब गायब झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर आठ दिवसांनी गवराई पाड्यातील इद्रशी यांनी आपली पत्नी आणि दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवली. या ही कुुटुंबाचा ठावठिकाणा लागलेला नाही. आता महेश पार्कमधील चौबे कुटुंबीय गूढरीत्या बेपत्ता झाल्याने तुळींज पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. यापूर्वी गायब झालेल्या इद्रशी व इगवे कुटुंबीयांचा अद्याप शोध लागलेला नसताना आता महेश पार्कमधून पती-पत्नी व त्यांची तीन मुले बेपत्ता झाल्याने या सर्व कुटुंबीयांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हानात्मक बनले आहे.नालासोपारा पूर्वेतील महेशपार्क मधील अनंता अपार्टमेंटमध्ये अमित अमरनाथ चौबे (३२) व रिता अमित चौबे (३०) हे दाम्पत्य मुलगी खुशी (१०), मुलगा गणेश (७) व लहान मुलगी नैनशी (५) बेपत्ता झाली आहेत. ५ जानेवारी रोजी भार्इंदर येथे राहणारा मनीष चौबे याला उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या त्याच्या लहान काकाच्या मुलाने फोन करुन अमित आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी मनीष सायंकाळी ५ वाजता अमित चौबेसह घरातील सर्व मंडळींना भेटून गेला होता. दुसऱ्या दिवशी (ता.६) दुपारी २ वाजताच्या सुमारास अमितची काकी शशिकला चौबे भेटायला गेली होती. परंतु घराला टाळे होेते. नातेवाईकांनी अमित व त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.पण, ठावठिकाणा न सापडल्याने अखेर मनीष चौबे याने १० जानेवारी रोजी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन पंधरा वर्षांच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याआधी डिसेंबर महिन्यांत सहा जण बेपत्ता झाल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान, एकट्या तुळींज पोलीस ठाण्यात ३२२ बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत.बेपत्ता प्रकरणातील अनेक प्रकरणांचा छडा लागलेला आहे. प्रेम प्रकरण किंवा स्वखुशीने घर सोडून गेलेल्यांचाही शोध लागलेला असतो. पण अशा प्रकरणात त्या व्यक्ती पुन्हा घरी येण्यास राजी नसतात. त्यामुळे बेपत्ता आणि आढळून आलेल्या आकड्यांमध्ये तफावत दिसून येते. मानवी तस्करीची प्रकरणे आपल्यात नाहीत तरी सुद्धा आपण बेपत्ता प्रकरणाची माहिती अँटी हयुमन ट्रॅफीकींग युनिटकडे देत असतो. जी कुटूंबे गायब आहेत त्यांचे मोबाइल फोन बंद असल्याने तपासात अडथळा येत आहे. खबरदारी म्हणून अशा प्रकरणांची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपासणी करीत आहोत.- श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक