शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
6
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
7
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
8
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
9
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
10
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
11
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
12
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
13
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
14
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
15
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
16
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
17
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
18
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
19
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
20
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

वसईत वर्षभरात १ हजार १९४ कुटुंब बेपत्ता

By admin | Updated: January 13, 2016 00:29 IST

तुळींज पोलीस ठाण्यात एका महिन्यात तीन कुटुंबातील १५ जण गायब झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात वसई तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मिळून

- शशी करपे,  वसईतुळींज पोलीस ठाण्यात एका महिन्यात तीन कुटुंबातील १५ जण गायब झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात वसई तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मिळून १ हजार १९४ जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. विशेष म्हणजे तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ३२२ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहे. यातील अनेक बेपत्तांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. गेल्या महिन्यात मोरेगावातील सात जणांचे इगवे कुुटुंब अचानक गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे हे कुुटुंब नऊ महिन्यांपासून बेपत्ता असतानाही त्यांच्या नातेवाईकांनी तुळींज पोलिसांकडे डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली. इगवे कुुटुंब ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय करतात. या कुटुंबात तीन पुरुष, तीन महिला आणि एका दहा महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. या कुटुंबांचा अद्याप शोध लागलेला नाही.इगवे कुटुंब गायब झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर आठ दिवसांनी गवराई पाड्यातील इद्रशी यांनी आपली पत्नी आणि दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवली. या ही कुुटुंबाचा ठावठिकाणा लागलेला नाही. आता महेश पार्कमधील चौबे कुटुंबीय गूढरीत्या बेपत्ता झाल्याने तुळींज पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. यापूर्वी गायब झालेल्या इद्रशी व इगवे कुटुंबीयांचा अद्याप शोध लागलेला नसताना आता महेश पार्कमधून पती-पत्नी व त्यांची तीन मुले बेपत्ता झाल्याने या सर्व कुटुंबीयांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हानात्मक बनले आहे.नालासोपारा पूर्वेतील महेशपार्क मधील अनंता अपार्टमेंटमध्ये अमित अमरनाथ चौबे (३२) व रिता अमित चौबे (३०) हे दाम्पत्य मुलगी खुशी (१०), मुलगा गणेश (७) व लहान मुलगी नैनशी (५) बेपत्ता झाली आहेत. ५ जानेवारी रोजी भार्इंदर येथे राहणारा मनीष चौबे याला उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या त्याच्या लहान काकाच्या मुलाने फोन करुन अमित आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी मनीष सायंकाळी ५ वाजता अमित चौबेसह घरातील सर्व मंडळींना भेटून गेला होता. दुसऱ्या दिवशी (ता.६) दुपारी २ वाजताच्या सुमारास अमितची काकी शशिकला चौबे भेटायला गेली होती. परंतु घराला टाळे होेते. नातेवाईकांनी अमित व त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.पण, ठावठिकाणा न सापडल्याने अखेर मनीष चौबे याने १० जानेवारी रोजी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन पंधरा वर्षांच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याआधी डिसेंबर महिन्यांत सहा जण बेपत्ता झाल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान, एकट्या तुळींज पोलीस ठाण्यात ३२२ बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत.बेपत्ता प्रकरणातील अनेक प्रकरणांचा छडा लागलेला आहे. प्रेम प्रकरण किंवा स्वखुशीने घर सोडून गेलेल्यांचाही शोध लागलेला असतो. पण अशा प्रकरणात त्या व्यक्ती पुन्हा घरी येण्यास राजी नसतात. त्यामुळे बेपत्ता आणि आढळून आलेल्या आकड्यांमध्ये तफावत दिसून येते. मानवी तस्करीची प्रकरणे आपल्यात नाहीत तरी सुद्धा आपण बेपत्ता प्रकरणाची माहिती अँटी हयुमन ट्रॅफीकींग युनिटकडे देत असतो. जी कुटूंबे गायब आहेत त्यांचे मोबाइल फोन बंद असल्याने तपासात अडथळा येत आहे. खबरदारी म्हणून अशा प्रकरणांची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपासणी करीत आहोत.- श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक