शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

जि.प. सीईओंच्या आश्वासनावर आंदोलन मागे

By admin | Updated: October 4, 2016 01:58 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता कामबंद आंदोलन पुकारले होते.

वर्धा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता कामबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडली होती. याच मागण्यांकरिता सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून असलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे. आरोग्य विभागात शासनाची मान्यता असताना अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, गौळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व एलआयसीच्या रकमेत असलेल्या घोळाची चौकशी करावी, यासह अनेक मागण्यांकरिता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गत महिन्यात काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणी झाल्या, शिवाय आरोग्य विभागामार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांचा खोळाबा झाला. यावरही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी काढण्याकरिता २० आॅक्टोबर पर्यंतचा कालावधी मागितला. शिवाय या काळात या समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. चर्चेच्यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, विभागीय सचिव नलीनी उबदेकर, जिल्हा अध्यक्ष सिंध्दार्य तेलतुंबडे, जिल्हा सचिव प्रभाकर सुरतकर, उपाध्यक्ष विजय जांगडे, अमीत कोपूलवार, संजय डफरे, रतन बेंडे, माया राउत, कोषाध्यक्ष विजय वांदिले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) प्रत्येक मागणीचे आदेश जमा ४आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरिता मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली प्रत्येक मागणी शासनाच्या आदेशानुसार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय करण्यात आलेल्या मागण्यांचे शासन आदेश मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे सीईओंनी मागण्या मान्य करण्याकरिता अवधी मागितल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली. २७ पीएससीतील काम ठप्प ४आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन आयोजित होते. या आंदोलनात जिल्ह्यातील संपूर्ण २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित असल्याने या केंद्रातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे दिसून आले. नागरिकांना तालुक्याच्या स्थळी जावून उपचार घ्यावे लागले.