शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शिक्षकांच्या बदलीचा काल्पनिक गुंता

By admin | Updated: April 10, 2017 01:24 IST

मे महिना जवळ येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली करण्याकरिता धावपळ सुरू झाली आहे;

अधिकाऱ्यांच्या स्वमर्जीने अवघड क्षेत्र यादी प्रस्तावितसमुद्रपूर : मे महिना जवळ येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली करण्याकरिता धावपळ सुरू झाली आहे; परंतु यावर्षी शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदलीचे क्षेत्र अवघड आणि सर्वसाधारण असे विभागून शिक्षकामध्ये संभ्रम निर्माण केला आहे. याच अनुषंगाने अवघड क्षेत्रातील बदलीकरिता तीन वर्षांची सेवा ग्राह्य धरल्यामुळे नेमके अवघड क्षेत्रात गावाची निश्चिती कशी करायची, याचे प्रशासकीय अधिकारी आपापल्या परीने तर्कवितर्क लावत आहेत. समुद्रपूर पं.स. अंतर्गत जवळपास ४५ ते ५० गावे जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार अवघड क्षेत्रात समाविष्ट होतात. स्थानिक शिक्षण विभागाने ३६ गावांची यादी तयार केली; परंतु बदली विषयाच्या नावाखाली केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या घेतलेल्या सभेत फक्त १३ गावे अवघड क्षेत्रात येत असल्याचे जि.प. प्रशासनाकडे प्रस्तावित केले. सदर सभेत केंद्र प्रमुखांनी आपापल्या केंद्रातील अवघड क्षेत्रात येत असलेल्या गावांची स्पष्ट कारणमिमांसा न केल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी यादीत कट मारला असल्याचे बोलले जात आहे. अवघड क्षेत्राची स्पष्ट माहिती देण्याची मागणी समुुद्रपूर : तालुका स्थळापासून २५ कि़मी. अंतरावरील, मुख्यमार्गापासून दोन किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर आणि दळणवळण सुविधा नसणारे, राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा नसलेले आणि महिलांच्या दृष्टिने जाण्या येण्यास अडचणींचे असलेले अश्या गावांचा अवघड क्षेत्रात समावेश करावा असे जिल्हास्तरावरुन निर्देश मिळाल्याचे स्थानिक शिक्षण विभाग सांगतात. तेव्हा या निर्देशाला अनुसरुन तालुक्यापासून ३० कि़मी. दूर असलेल्या व दळणवळण सुविधा नसलेल्या कोरा केंद्रातील पवनगाव, गांगापूर करुळ, एकोडी, चाफापूर या गावाचा, निंभा केंद्रातील किन्ही, धरणाच्या पुरात अडकलेले झुनका, बससेवा नसलेले कवठा, गिरड केंद्रातील जंगलात असलेले आर्वी, तावी, मोहगाव, भोसा केंद्रातील पारडी, रज्जाकपूर ते देरडा, बावापूर, नंदोरी केंद्रातील डोंगरगाव, गणेशपूर, बल्लारपूर, हळदगाव केंद्रातील खंडाळा, शिवणी बेडासह इतर केंद्रातील महिलांच्या दृष्टीने अवघड व जाण्यायेण्याची सोयसुविधा नसलेले १५ ते २० गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करुन जि.प. प्रशासनाकडे प्रस्तावित करायला पाहिजे होती. परंतु, स्थानिक पातळीवरील संंबंधित अधिकाऱ्यांनी एकूण घेतले नसल्याचे शिक्षण विभाग सांगतात जिथे नोकरी तिथे मुख्यालय तेव्हा जाण्या-येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अवघड क्षेत्राचा लाभ नाही, असाही प्रतिप्रश्न बोलला गेल्याचे शिक्षक सांगतात. एकंदर अधिकाऱ्यांच्या मर्जीने शासननिर्णयाची अंमलबजावणी करणे, संबंधित शिक्षण विभागाची चुप्पी यामुळे मात्र शिक्षण हैरान होऊन अवाजवी त्रासाला सामोरे जात आहे. तेव्हा अवघड क्षेत्रातील गाव निश्चितीचे स्वयंस्पष्ट व शिक्षकांना समाधानकारक असे धोरण जि.प. प्रशासनाने ठरवावे जेणे करुन जास्तीत जास्त शिक्षकांना बदलीचा लाभ देता येईल.(तालुका/शहर प्रतिनिधी)प्रस्तावित केलेल्या यादी व्यतिरिक्त इरतही केंद्रातील गावे लांब अंतरावरील असून सोयीसुविधा नसलेले आहे. नदी, धरण, जंगलव्याप्त असलेल्या गावाची माहिती जि.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिली जाईल. - अजय गावंडे, विभागीय अध्यक्ष, प्राथ.शिक्षक संघ,जि. वर्धा