शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

जि.प. शिक्षकांच्या बदलीचा काल्पनिक गुंता

By admin | Updated: April 10, 2017 01:24 IST

मे महिना जवळ येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली करण्याकरिता धावपळ सुरू झाली आहे;

अधिकाऱ्यांच्या स्वमर्जीने अवघड क्षेत्र यादी प्रस्तावितसमुद्रपूर : मे महिना जवळ येत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली करण्याकरिता धावपळ सुरू झाली आहे; परंतु यावर्षी शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदलीचे क्षेत्र अवघड आणि सर्वसाधारण असे विभागून शिक्षकामध्ये संभ्रम निर्माण केला आहे. याच अनुषंगाने अवघड क्षेत्रातील बदलीकरिता तीन वर्षांची सेवा ग्राह्य धरल्यामुळे नेमके अवघड क्षेत्रात गावाची निश्चिती कशी करायची, याचे प्रशासकीय अधिकारी आपापल्या परीने तर्कवितर्क लावत आहेत. समुद्रपूर पं.स. अंतर्गत जवळपास ४५ ते ५० गावे जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार अवघड क्षेत्रात समाविष्ट होतात. स्थानिक शिक्षण विभागाने ३६ गावांची यादी तयार केली; परंतु बदली विषयाच्या नावाखाली केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या घेतलेल्या सभेत फक्त १३ गावे अवघड क्षेत्रात येत असल्याचे जि.प. प्रशासनाकडे प्रस्तावित केले. सदर सभेत केंद्र प्रमुखांनी आपापल्या केंद्रातील अवघड क्षेत्रात येत असलेल्या गावांची स्पष्ट कारणमिमांसा न केल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी यादीत कट मारला असल्याचे बोलले जात आहे. अवघड क्षेत्राची स्पष्ट माहिती देण्याची मागणी समुुद्रपूर : तालुका स्थळापासून २५ कि़मी. अंतरावरील, मुख्यमार्गापासून दोन किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर आणि दळणवळण सुविधा नसणारे, राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा नसलेले आणि महिलांच्या दृष्टिने जाण्या येण्यास अडचणींचे असलेले अश्या गावांचा अवघड क्षेत्रात समावेश करावा असे जिल्हास्तरावरुन निर्देश मिळाल्याचे स्थानिक शिक्षण विभाग सांगतात. तेव्हा या निर्देशाला अनुसरुन तालुक्यापासून ३० कि़मी. दूर असलेल्या व दळणवळण सुविधा नसलेल्या कोरा केंद्रातील पवनगाव, गांगापूर करुळ, एकोडी, चाफापूर या गावाचा, निंभा केंद्रातील किन्ही, धरणाच्या पुरात अडकलेले झुनका, बससेवा नसलेले कवठा, गिरड केंद्रातील जंगलात असलेले आर्वी, तावी, मोहगाव, भोसा केंद्रातील पारडी, रज्जाकपूर ते देरडा, बावापूर, नंदोरी केंद्रातील डोंगरगाव, गणेशपूर, बल्लारपूर, हळदगाव केंद्रातील खंडाळा, शिवणी बेडासह इतर केंद्रातील महिलांच्या दृष्टीने अवघड व जाण्यायेण्याची सोयसुविधा नसलेले १५ ते २० गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करुन जि.प. प्रशासनाकडे प्रस्तावित करायला पाहिजे होती. परंतु, स्थानिक पातळीवरील संंबंधित अधिकाऱ्यांनी एकूण घेतले नसल्याचे शिक्षण विभाग सांगतात जिथे नोकरी तिथे मुख्यालय तेव्हा जाण्या-येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अवघड क्षेत्राचा लाभ नाही, असाही प्रतिप्रश्न बोलला गेल्याचे शिक्षक सांगतात. एकंदर अधिकाऱ्यांच्या मर्जीने शासननिर्णयाची अंमलबजावणी करणे, संबंधित शिक्षण विभागाची चुप्पी यामुळे मात्र शिक्षण हैरान होऊन अवाजवी त्रासाला सामोरे जात आहे. तेव्हा अवघड क्षेत्रातील गाव निश्चितीचे स्वयंस्पष्ट व शिक्षकांना समाधानकारक असे धोरण जि.प. प्रशासनाने ठरवावे जेणे करुन जास्तीत जास्त शिक्षकांना बदलीचा लाभ देता येईल.(तालुका/शहर प्रतिनिधी)प्रस्तावित केलेल्या यादी व्यतिरिक्त इरतही केंद्रातील गावे लांब अंतरावरील असून सोयीसुविधा नसलेले आहे. नदी, धरण, जंगलव्याप्त असलेल्या गावाची माहिती जि.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिली जाईल. - अजय गावंडे, विभागीय अध्यक्ष, प्राथ.शिक्षक संघ,जि. वर्धा