शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

संच निर्धारणाच्या दुरूस्तीकरिता जि.प. समोर शिक्षकांचे उपोषण

By admin | Updated: February 5, 2015 23:13 IST

शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये संच निर्धारणाध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संख्या चुकीच्या पद्धतीने निश्चित केल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे केली

वर्धा : शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये संच निर्धारणाध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संख्या चुकीच्या पद्धतीने निश्चित केल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे केली असता त्यांनी यात दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या; मात्र शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी त्यांच्या पत्राला बगल देत कुठलीही दुरूस्ती केली नाही. संच निर्धारणात दुरूस्ती करण्याच्या मागणीकरिता गुरुवारपासून तक्रार निवारण समितीच्यावतीने जि.प. इमारतीसमोर उपोषण सुरू केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या संच निर्धारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक संख्या कमी झाल्याने अनेक शाळेत वर्ग नववी व दहावीच्या तुकड्या बंद पडल्या आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या निकषानुसार जर शिक्षकांचा विचार केला तर प्रत्येक शाळेत एक शिक्षक देय होत आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात नववी व दहावी इयत्तांचा समावेश केला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या या संच निर्धारणामुळे शासनाच्या गुणवत्ता पुरक शिक्षणाच्या हेतुला छेद दिल्याचा आरोप तक्रार निवारण समितीने केला आहे. माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी समस्या जाणून घेतली.(प्रतिनिधी)