शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभेचे सावट

By admin | Updated: September 16, 2014 23:55 IST

येत्या २१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट पसरले आहे. जिल्हा परिषद हातून गेली तर त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकांवर होईल,

वर्धा : येत्या २१ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीचे सावट पसरले आहे. जिल्हा परिषद हातून गेली तर त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकांवर होईल, अशी भीती सर्वच राजकीय पक्षांना असल्यामुळे या निवडणुकीसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. जिल्हा परिषदेवर आजतागायत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीच सत्ता राहिली आहे. अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा भाजपचे काँग्रेसच्या बरोबरीने म्हणजेच प्रत्येकी १७ सदस्य निवडून आले होते. जि.प. वर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून पराकोटीच्या हालचाली झाल्या. ऐनवेळी काँग्रेसच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावून आली. तरीही बहुमतासाठी एका जागेची गरज होती. दुसरीकडे भाजपही सत्ता स्थापनेसाठी धडपडत होता. भाजपकडे स्वभाप ३, सेना १ आणि चार अपक्ष असे संख्याबळ झाले. अखेर तटस्थ असलेल्या गोपाल कालोकर या अपक्ष सदस्यांच्या हातात सत्तेची किल्ली आली. ते ज्या गटात बसणार त्या गटाचा अध्यक्ष अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र कालोकर हे काँग्रेसशी जुळलेले असल्यामुळे त्यांनी आघाडीसोबतच बसण्याचा निर्णय घेतला. यामुळे आघाडीला सत्ता टिकविणे शक्य झाले. आणि पर्यायाने भाजपाचे पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अडीच वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आघाडीतील एका सदस्याचे निधन झाल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आणि भाजपचे संख्याबळ एकने वाढले. अशातच स्वभापचा एक सदस्य काँग्रेस गोटाशी हातमिळवणी करुन असल्यामुळे आघाडीच्या संख्येत कुठलाही फरक पडला नाही. मात्र आता माजी खासदार दत्ता मेघे हे भाजपमध्ये आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याची माहिती आहे. त्यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे काही जि.प. सदस्य त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर राहिल्यास काँग्रेस-राकाँ आघाडीला सत्ता टिकविणे कठिण जाईल, असे बोलले जात आहे. असे झाल्यास लोकसभा जशी भाजपचे बळकावली. तशीच जिल्हा परिषदही हस्तगत केल्यास याचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर होईल, अशी शक्यताही जाणकार वर्तवीत आहे. एकूणच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही आघाडीतील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची तर भाजप नेत्यांसाठी वर्चस्वाची ठरणार आहे. यात कोण जिंकतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)