शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

जि.प. व पं. स. निवडणुकीतील उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब

By admin | Updated: February 7, 2017 01:06 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या प्रचाराच्या वाऱ्यांनी तापत आहे.

अपक्षांना मिळणार चिन्ह : अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस वर्धा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या प्रचाराच्या वाऱ्यांनी तापत आहे. जे रिंगणात राहणार ते कामाला लागले आहेत; मात्र काहींनी नाराजीमुळे पक्षाशी बंडाळी केली तर काहींनी हौस म्हणून नामांकन दाखल केले. त्यांची मनधरणी पक्षाकडून सुरू आहे. या मनधरणीला कोण साद देत नामांकन परत घेतो आणि कोण रिंगणात दंड थोपटतो, हे उद्या मंगळवारी (दि.७) स्पष्ट होणार आहे. नामांकन परत घेण्याची उद्या अंतिम तारीख असून त्याच दिवशी अपक्षांना चिन्हही मिळणार आहे. नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची छाननी झाली. दाखल झालेल्या नामांकनापैकी ३३ नामांकन बाद ठरले. नामांकन अर्ज दाखल करताना काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हातून झालेल्या चूका त्यांच्याच अंगलटी आल्या. यात अनेकांना फटका बसला. यावर काहींनी आक्षेप घेतला असून त्यावर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडीनंतर आजच्या स्थितीत निवडणूक रिंगणात एकूण ९६३ उमेदवार आहेत. यात जिल्हा परिषदेचे ३५९ तर पंचायत समितीचे एकूण ५६७ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी कोण रिंगणात राहतो आणि कोण माघार घेतो यावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०४ जागांकरिता १६ फेबु्रवारीरोजी निवडणूक होणार आहे. यात वाढोणा आणि मोरांगणा या दोन गट आणि त्याअंतर्गत येत असलेल्या चार गणांकरिता दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यांच्याकरिता नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची रंगत जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार रिंगणात उतरविले आहे. यात काहींनी एका पक्षाने उमेदवारी नाकरल्याने वेळीच दुसऱ्या पक्षाला हात देत उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे. तर काहींनी पक्षाने तिकिट नाकरल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडखोरी केली. या बंडखोरांच्या मनधरणीकरिता राजकीय पक्षातील जिल्हास्तरावरील नेते लागले आहेत. शिवाय उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्याशी संधान जोडणे सुरू केल्याची चर्चा आहे. यात त्यांना कितपत यश येते याचा खुलासा उद्याच होणार आहे. यात किती जण नामांकन परत घेतात आणि किती रिंगणात राहतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी) अनेकांना हवे आवडीचे चिन्हजिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता होणाऱ्या निवडणुकीत अनेक अपक्षांनी नामांकन दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करतानाच त्यावर असलेल्या तीन चिन्हापैकी एका चिन्हाची निवड करण्याचा नियम आहे. यानुसार उमेदवारांनी त्यांना हव्या असलेल्या चिन्हाची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्जातूनच केली आहे. यात निवड केलेले आवडीचे चिन्ह मिळते अथवा वेळेवर दुसऱ्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागते याकडे उमेदवारांचे लक्ष आहे.