शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

युवक-युवतींना सैनिकी प्रशिक्षण आवश्यक

By admin | Updated: May 2, 2017 00:20 IST

‘देश प्रथम’ ही भावना युवापिढीत रूजविण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

मंगेश जोशी : १८७ वा प्रहारच्या अ‍ॅडव्हेंचर कॅम्पचा समारोपवर्धा : ‘देश प्रथम’ ही भावना युवापिढीत रूजविण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विपरित परिस्थितीशी झुंज देण्याचे सामर्थ्य, समाजाप्रती आपुलकी व कृतीतून योग्य संस्कार प्रतिबिंबीत करण्याची गरज आहे. प्रहार समाज जागृती संस्थेचे प्रशिक्षण याच धर्तीवर असल्याने प्रहारचे सैनिकी प्रशिक्षण तरूण-तरूणींना देणे गरजेचे आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी व्यक्त केले. प्रहारच्या १८७ व्या अ‍ॅडव्हेंचर शिबिराच्या समारोप शुक्रवारी सेवाग्राम येथील शहीद राजीव दीक्षित भवन येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रहार संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप दाते तर अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. शिबिरात जिल्ह्यातील निवडक ५५ मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.पगार यांनी प्रहार संस्थेचे प्रशिक्षण खडतर असून आजच्या बालकांना तसेच युवापिढीला अशा प्रशिक्षणाची आवड आहे. प्रहारचा कॅम्प इतर शिबिरापेक्षा आगळावेगळा असतो, असे सांगितले. अग्रवाल यांनी प्रहारच्या प्रशिक्षणातून सैनिकी मानसिकता समाजात निर्माण होत आहे, असे सांगितले. बेलखोडे व दाते यांनी मागील २२ वर्षांपासून साहसी शिबिर घेतले जात असल्याचे सांगितले.प्रहार अ‍ॅडव्हेंचर कॅम्पच्या समारोप प्रसंगी सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरात प्रहारींनी चित्तथरारक १५ प्रकारचे अडथळा पार प्रशिक्षणाचे प्रात्याशिक सादर केले. कार्यक्रमाची सुरूवात ‘शहिदो की चिताओ पर खडी हुई स्वतंत्रता आज लडखडा रही है, क्या हुआ नही पता!, मेरे वतन...’ या देशभक्तीपर गीताने प्रहारींनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी नालवाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्यावतीने शिबिरार्थ्यांना ‘पेन पाऊच’ भेट करण्यात आले. दरम्यान, बाळकृष्ण हांडे, डॉ. शोभा बेलखोडे, सुप्रभात बावनगडे व चेतन खडसे यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविकातून गुजरकर यांनी प्रहार संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संतोष तुरक यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र गुजरकर यांनी मानले. साहसी शिबिर तथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता अश्विनी घोडखांदे, वैशाली गुजरकर, स्वप्नील शिंगाडे, धीरज कामडी, मंगेश शेंडे यांच्यासह प्रहार स्वयंसेवकांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)