शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

युवकांनी आपली उर्जा विधायक कार्यात लावून उंच झेप घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:07 IST

तरुण-तरुणी शिक्षण घेवून शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नोकरी शोधू लागतात. शाळा महाविद्यालयातून मिळणार शिक्षण हे व्यावसायाभिमुख असले पाहिजे.

ठळक मुद्देरामदास तडस : विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतपुलगाव : तरुण-तरुणी शिक्षण घेवून शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नोकरी शोधू लागतात. शाळा महाविद्यालयातून मिळणार शिक्षण हे व्यावसायाभिमुख असले पाहिजे. व्यावसायिक शिक्षण मिळाल्यास तरुण स्वत:चा व्यवसाय करू इच्छितो किंवा उद्योग उभा करू शकतो. सरकार व्यवसाय करणाऱ्यांना व उद्योग उभा करणाºयांना शासन आर्थिक मदत करते. तरुणांनी नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बनावे. शिवाय त्यांनी आपली उर्जा विधायक कार्यात खर्च करावी, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने आयोजित त्रि-दिवसीय उडान पारिवारीक कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी गिमाटेक्स हिंगणघाट व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोहता, माहेश्वरी युवा संघटनेचे शरद मुंधडा, अध्यक्ष भूषण गांधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होते.मार्गदर्शन करताना प्रशांत मोहता यांनी अनेक युवक आज व्यवसायिक व उद्योजक बनत आहेत. परंतु, उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली व माहिती कृतीत कशी उतरवावी हे आपल्यावर अवलंबून आहे. व्यवसायात अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. इतकेच नव्हे तर व्यवसायात येणारे आवाहने स्वीकारावी लागतात. त्यासाठी उद्योजकात खिलाडी वृत्ती व खेळाचे आकर्षण असणे गरजेचे आहे, असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते. उद्घाटनपर कार्यक्रमाला आ. रणजीत कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शितल गाते, समाजसेवक प्रभाकर शहाकार, सरपंच सविता गावंडे यांच्या उपस्थिती होती. यावेळी राजीव गांधी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आहे. तर विशेष कार्यशाळेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अशोक कोठारी यवतमाळ यांनी मार्गदर्शन केले. शेतकºयांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत डॉ. सूर्यप्रकाश मालानी व शिवाजी महाविद्यालय अमरावती येथील प्रा. दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात खा. तडस यांच्या हस्ते संदीप ढोमणे, श्रीकांत राठी, भरतकुमार अग्रवाल, यांच्यासह संगम सेवा समिती, रामदेबाबा मंदिर, माहेश्वरी युवा संगठनच्या पदाधिकाºयांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.संचालन गिरीराज मालपाणी यांनी तर आभार महेश चांडक यांनी मानले. कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष आशीष गांधी, कमलकिशोर माहेश्वरी, ब्रिजमोहन मोहता, गौरव राठी, तुषार चांडक, शेखर पनपालिया, कमल गांधी, पलाश चांडक, योगेश भट्टड, यांचेसह माहेश्वरी मंडळ, युवा संगठनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.