शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तरुणांनी राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

पुलगाव येथील सिएडी कॅम्पमध्ये बुद्ध विहार समितीव्दारा विहाराच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रिगेडीयर एस.एस. बालाजी होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे, मोहन अग्रवाल, इमरान राही, डेप्टी कमांडंट परमविर सिंग, डॉ. सुरेंद्र नितनवरे, फारूख धामियॉ, पी.के. रामटेके, ए. मोटवानी यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देखासदार : सीएडी कॅम्पमध्ये बौद्ध धम्म मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : वर्तमानात घडणाऱ्या सर्व हिंसाचाराच्या घटना निश्चित माणुसकीला कलंक लावणाºया घटना आहे. माणसातील माणूसकीला स्मरून, स्वार्थ बाजूला ठेऊन राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देण गरजेचे आहे. हिंसाचार माणूसकीवर कलंक असून भगवान गौतम बद्धांंचा अहिंसेचा मार्ग पत्करून वाट चुकलेल्या तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होत राष्ट्र निर्माण कार्यात अग्रेसर व्हावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.पुलगाव येथील सिएडी कॅम्पमध्ये बुद्ध विहार समितीव्दारा विहाराच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रिगेडीयर एस.एस. बालाजी होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे, मोहन अग्रवाल, इमरान राही, डेप्टी कमांडंट परमविर सिंग, डॉ. सुरेंद्र नितनवरे, फारूख धामियॉ, पी.के. रामटेके, ए. मोटवानी यांची उपस्थिती होती. यावेळी ब्रिगेडीयर बालाजी म्हणाले की, भगवान बौद्धाच्या अहिंसेच्या शास्त्राने जगातील कोणतेही युद्ध जिंकू शकतात. एवढेचे नव्हेतर संपूर्ण विश्वात शांती निर्माण करू शकतात. असे त्यांनी सांगितले. डॉ. ओम्बासे यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून घेणाºया या देशातील नागरिकांनी स्वातंत्र्याची फळे सर्वसामान्य दलित-पीडितांना मिळावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. यावेळी इमरान राही, मोहन अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पी.के. रामटेके यांनी केले. संचालन रजनी जीवने तर आभार नितीन धनमोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील मुन, प्रवीण माटे, धनपाल रामटेके, अनिल गावंडे, रजनीकांत डोंगरे, राहुल घंगारे, प्रदीप कांबळे, नितीन सिदुरकर आदींसह सी.ए.डी. कॅम्पच्या कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस