शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी नागरिक म्हणून आपली

By admin | Updated: February 26, 2016 02:42 IST

स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास स्त्री-पुरूष समानतेचा नाही. १९५० मध्ये आपली राज्यघटना तयार झाली आणि सर्वांना समान अधिकार मिळाले.

लीलाताई चितळे : विदर्भस्तरीय महिला सरपंच संवाद मेळावावर्धा : स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास स्त्री-पुरूष समानतेचा नाही. १९५० मध्ये आपली राज्यघटना तयार झाली आणि सर्वांना समान अधिकार मिळाले. सरपंच म्हणून तुम्ही शासकीय यंत्रणेचा भाग आहात. तुमच्या आवाजाला महत्त्व आहे. म्हणून समाज परिवर्तनाला गती दिली पाहिजे. २१ व्या शतकात जगत असतानाही समाज इतिहासातच राहून विचार करतो. ही मानसिकता बदलण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी एक नागरिक म्हणून आपली आहे. याचे भान असू द्या. प्रेम व निर्भयतेने सामोरे जा, असे आवाहन नागपूरच्या ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी केले. श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरीद्वारे सोमवार व मंगळवारी दोन दिवसीय विदर्भस्तरीय महिला सरपंच संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या मूल्यांसाठी लढा दिला, स्त्री-पुरूषांना समानतेने जगता यावे याचा आग्रह धरला, त्या बाबी तुम्हाला पाहून बऱ्याच अंशी पूर्र्ण झाल्याचे समाधान वाटते, असे मतही चितळे यांनी व्यक्त केले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुमन बंग तर अतिथी म्हणून संध्या सातपुते, अ‍ॅड. शीतल भुरे, सुचेता इंगोले आदी उपस्थित होते. बंग यांनी सर्व महिला सरपंचांनी गावातील महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी व्यसनमुक्ती, दारूबंदीसारखे कार्यक्रम अग्रक्रमाने गावात राबवावे, असे सांगितले. दुपारच्या सत्रात सरपंच महिलांनी जि.प. प्रशासन, रेशन, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाशी निगडीत कामाचे अनुभव, अडचणी व्यक्त केल्या. अन्य गावांतील महिला सरपंचांच्या अनुभवातून काही मुद्यांचा खुलासा झाला. सायंकाळच्या सत्रात महिला राजसत्ता आंदोलनाच्या रत्नामाला, मालती आणि शारदा यांनी चटईच्या आकाराच्या सापशिडीच्या खेळाद्वारे ग्रा.पं. चा कारभार, आर्थिक, व्यवहार, लोकसहभाग, नियमांची माहिती आदी प्रमुख मुद्यांचे विवेचन केले. रात्रीच्या सत्रात चेतना विकासच्या समुपदेशक संध्या सातपुते, अ‍ॅड. शीतल भुरे व सुचेता इंगोले यांनी कौटुंबिक हिसांचार व महिलांबाबत विविध कायद्यांची माहिती दिली. गावात घडणाऱ्या घटनांची नोंद घेऊन समाधान केंद्रामार्फत गरजू महिलांना आवश्यक कायदेशीर सल्ला व आधार मिळवून देता येईल, असे सांगितले. संचालन नूतन माळवी यांनी केले.महिला सरपंच संवाद मेळाव्याला भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर व वर्धेच्या बहुसंख्य महिला सरपंच उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी केले. प्रास्ताविक अतुल शर्मा यांनी केले. संचालन प्रा. राजेश देशपांडे व प्रा. सलीम मोहम्मद यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रामविकास तंत्रनिकेतनचे कार्यकर्ते, वसतिगृहाच्या प्रभारी आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)