शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी पालिकेसमोर गायींसह युवकाचे उपोषण

By admin | Updated: September 23, 2016 02:25 IST

शहरात रस्त्याच्या कडेला कचऱ्यावर पडून असलेले प्लास्टिक खाल्ल्याने येथील चंद्रशेखर जनार्दन बेलखोडे यांच्या आठ गाई, सहा बकऱ्या व तीन वासरे दगावली.

आतापर्यंत १७ गुरांचा मृत्यू : अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सिंदी (रेल्वे) : शहरात रस्त्याच्या कडेला कचऱ्यावर पडून असलेले प्लास्टिक खाल्ल्याने येथील चंद्रशेखर जनार्दन बेलखोडे यांच्या आठ गाई, सहा बकऱ्या व तीन वासरे दगावली. याला पालिकेचे स्वच्छतेबाबत असलेले उदासीन धोरण जबाबदार असल्याचा आरोप करीत बेलखोडे याने गुरुवारी पालिकेसमोरच आपल्या गाईसोबत उपोषण सुरू केले आहे. शहराने अस्वच्छतेचा कळस गाठला. यात बंदी असताना व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक थैल्यांचा वापर होत आहे. या थैल्या नागरिकांकडून वापर झाल्यानंतर रस्त्यावर टाकण्यात येत आहे. रस्त्यावर असलेल्या या थैल्या मोकाट फिरत असलेल्या जनावरांच्या खाण्यात जातात. असाच प्रकार बेलखोडे यांच्या जनावरासंदर्भात घडला. यात त्यांची गुरे दगावल्याने त्यांना मोठा झटका बसला. त्यामुळे मृत गुरांची नुकसान भरपाई मिळावी तसेच शहरात स्वच्छता नांदावी याकडे लक्ष वेधण्याकरिता बेलखोडे यांनी उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व न.प. प्रशासन याच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. उपोषणस्थळी काँग्रेसचे गटनेते व नगरसेवक आशिष देवतळे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक अजय कलोडे, खरेदी विक्री संस्थेचे संचालक सुधाकर वाघमारे, समाजसेवक अशोक सातपुते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती दर्शवून दर्शविली.(प्रतिनिधी)