शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

तरूणांनी ज्ञानार्थी असावे

By admin | Updated: October 9, 2014 23:07 IST

जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर

नवनीत देशमुख : वाचनातून होते विचारांची निर्मितीवर्धा : जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊनच शिक्षणाकडे वळायला हवे. ज्ञानार्थी व्यक्तीला पोटाची चिंता बाळगण्याची गरज नस्ते, परिश्रम कधीच वाया जात नाही, तरूणांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य साहित्यात असून याकरिता वाचन करावयास हवे, असे विचार कथाकार प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केले. पिपरी (मेघे) येथील जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात मराठी अभ्यास मंंडळाच्या कार्यक्रमात प्रमुख मारगदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. पुरूषोत्तम कालभूत, उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार, मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष वीणालाल उपरीकर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे मराठी अभ्यास मंडळ गठित करण्यात आले. तसेच विद्यार्थी व अभ्यास मंडळाच्या कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रा. देशमुख यांनी प्रवास ही कथा सादर केली. यानंतर बोलताना डॉ. कालभूत म्हणाले, समाजातील प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टींची नोंद साहित्यात होत असते. साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असतो, विद्यार्थी हे समाजाचे भविष्य असते, आपले भविष्य उज्वल करण्याकरिता विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्तीची कास धरावी, शिक्षणाचा वापर यशप्राप्ती तसेच व्यक्तिमत्वाच्या विकासाकरिता करावा, असे आवाहन केले. तसेच प्रा. सुरेश पवार यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मराठी विभाग प्रमुखांनी मंडळाची भुमिका विशद केली. तसेच मंडळाकडून राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मसने यांनी केले तर आभार प्रदर्शन वीणालाल उपरीकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनाला सदस्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)