शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

तरूणांनी ज्ञानार्थी असावे

By admin | Updated: October 9, 2014 23:07 IST

जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर

नवनीत देशमुख : वाचनातून होते विचारांची निर्मितीवर्धा : जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊनच शिक्षणाकडे वळायला हवे. ज्ञानार्थी व्यक्तीला पोटाची चिंता बाळगण्याची गरज नस्ते, परिश्रम कधीच वाया जात नाही, तरूणांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य साहित्यात असून याकरिता वाचन करावयास हवे, असे विचार कथाकार प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केले. पिपरी (मेघे) येथील जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात मराठी अभ्यास मंंडळाच्या कार्यक्रमात प्रमुख मारगदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. पुरूषोत्तम कालभूत, उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार, मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष वीणालाल उपरीकर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे मराठी अभ्यास मंडळ गठित करण्यात आले. तसेच विद्यार्थी व अभ्यास मंडळाच्या कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रा. देशमुख यांनी प्रवास ही कथा सादर केली. यानंतर बोलताना डॉ. कालभूत म्हणाले, समाजातील प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टींची नोंद साहित्यात होत असते. साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असतो, विद्यार्थी हे समाजाचे भविष्य असते, आपले भविष्य उज्वल करण्याकरिता विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्तीची कास धरावी, शिक्षणाचा वापर यशप्राप्ती तसेच व्यक्तिमत्वाच्या विकासाकरिता करावा, असे आवाहन केले. तसेच प्रा. सुरेश पवार यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मराठी विभाग प्रमुखांनी मंडळाची भुमिका विशद केली. तसेच मंडळाकडून राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मसने यांनी केले तर आभार प्रदर्शन वीणालाल उपरीकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनाला सदस्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)