शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ने घेतला ठाव

By admin | Updated: February 5, 2016 01:43 IST

शेतकऱ्यांची वेतना ही देशव्यापी असून शेतीत राबणाऱ्या हातांनी आता शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दोन हात करायला शिकले पाहिजे,

इंद्रजित भालेराव यांचे काव्यगायन रंगले : दाते स्मृती व्याख्यानमालेतील उपक्रमवर्धा : शेतकऱ्यांची वेतना ही देशव्यापी असून शेतीत राबणाऱ्या हातांनी आता शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दोन हात करायला शिकले पाहिजे, अशी भूमिका मांडत ‘शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायाला शिक’, असे आवाहन शेतकऱ्यांचा कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या परभणीचे इंद्रजित भालेराव यांनी केले. यशवंतराव दाते स्मृती संस्था आयोजित व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात त्यांच्या काव्यगायनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात तब्बल दोन तास रंगलेल्या या काव्यगायन कार्यक्रमात आपला जीवनपट उलगडून दाखवितानाच दर्जेदार व लयबद्ध कवितांनी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी रसिकांना भुरळ घातली. आजच्या कवींनी शेतकरी आणि गाव, हे विषय विनोदाचे केले आहेत. महात्मा फुल्यांचा शेतकरी अजूनही कवितेतून व्यक्त होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी, मंचावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, प्रा. शेख हाशम, संजय इंगळे तिगावकर, डॉ. स्मीता वानखेडे आदी उपस्थित होते. ‘पाखरं असली तरी ती ओळखायच्या बापाच्या मनातील भाव, सुगी संपली तरी चिमण्या सोडत नसायच्या गाव’ ही परिस्थिती आता बदलत चालली आहे. गांधींनी दिलेला ‘गावाकडे चला’ हा संदेश गावे स्वयंपूर्ण व स्वावलंबी व्हावीत या उद्देशाने होता, असे सांगून भालेराव यांनी, ‘काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’, ‘शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची छाप, तिथे राबतो कष्टतो, माझा शेतकरी बाप’ आदी कविता सादर केल्या. ‘पंतप्राधन म्हणाले की, शेतकऱ्याला आपल्या देशाचे नियोजन करता येत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी म्हणाले, आतापर्यंत या देशाचे नियोजन जमले नाही, म्हणून किती पंतप्रधानांनी आत्महत्या केल्या? असा प्रश्न उपस्थित करीत ‘मरायला नाही आता मारायला शिक, शिक बाबा शिक जगायला शिक’ हा आपल्या कवितेचा धागा पुढे नेला. त्यांनी ‘एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भालाफेक’ हे गीत सादर केले आणि उपस्थितांनीही गाण्यासोबत ठेका धरला. संचालन डॉ. स्मीता वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, सुनील राऊत, डॉ. शिरीष गोडे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्राचार्य रोंघे, प्रा. कोंगरे, डॉ. कोटेवार, अभ्युदय मेघे, मधुकर इंगळे, जयंत साळवे, अशोक चौधरी, प्रा. राजेंद्र गावंडे, प्रा. डी.के. देशमुख, शेषराव बिजवार, पंडित देशमुख, लक्ष्मीनारायण सोनवणे, माहिती सहायक श्याम टरके, डॉ. खंडारे, प्रा. किशोर वानखडे, मीना कारंजेकर, मुरलीधर बेलखोडे, डॉ. तारक काटे, भाऊ थोटे, प्रकाश येंडे, डॉ. दीपक पुनसे, रंजना दाते, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. विजय बोबडे, डॉ. ना.ह. खोडे, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. प्रमोद नारायणे, गौरीशंकर टिबडेवाल, दिलीप कठाणे, वसंत जळीत, प्रा. काळे, गुणवंत डकरे, नंदकुमार वानखेडे आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)