शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

साडे चार एकर केळीच्या बागेतून २२.८४ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:09 IST

पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे.

ठळक मुद्दे २८ किलो वजनाचा एक घड : पवनार येथील शेतकऱ्यांचे धाडस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतकऱ्यांने केळीची बाग फुलविली आहे.पवनार येथील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी ५ मार्च २०१७ रोजी आपल्या साडे चार एकर शेतात केळीची लागवड केली होती. केळीचा बागायतदार तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलूतून केळीचे पीक हद्दपार झाल्याची ओर होत आहे. असे असताना वाघमारे यांनी पवनार येथील आपल्या शेतात केळीची बाग तयार करण्याची किमया साध्य केली आहे. अकरा महिने परिश्रम घेतल्यानंतर त्यांना विक्रमी उत्पादन घेता आले आहे. सध्या त्यांच्या साडे चार एकर शेतात केळीची ६ हजार ८०० झाडे आहेत. प्रत्येक झाडाला केळीचे घड लागलेले आहेत. एका घडाचे वजन सुमारे २८ किलो झाले आहे. सध्या बाजारपेठेत केळीच्या घडाला १२ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहेत. एकूण हिशेब लक्षात घेतला तर त्यांना तब्बल २२ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न या साडे चार एकर शेतातून मिळणार आहे.शेतकºयांनी आधुनिक शेती केल्यास उत्पादन व जीवनमान उंचावता येते, हे वाघमारे यांनी सिद्ध केले आहे. पारंपरिक पिकांची कास धरून त्यांना केवळ साडे चार एकर शेतात कधीही एवढे उत्पन्न घेता आले नसते; पण केळीची बाग फुलविण्याचे धाडस केल्याने केवळ वर्षभरात त्यांना २२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकले आहेत. वाघमारे यांनी शासकीय नोकरी सोडून शेती पत्करली; पण अन्य शेतकरी पारंपरिक पिकांवरच भर देत असल्याने नापिकीचा सामना करावा लागतो. अन्य शेतकऱ्यांनी सुविधा प्राप्त करून घेत आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.प्रयोगशीलता हवीपारंपरिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याला फारसे उत्पन्न मिळत नाही; पण शेतीत प्रयोगशीलता गरजेची आहे. विविध प्रयोग राबवून व्यवसाय म्हणून शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून जीवनमान उंचाविणे शक्य होऊ शकते. यामुळे शेतकºयांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.