शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

हरभºयाच्या पेºयात यंदा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:04 IST

खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

ठळक मुद्दे२० टक्क्यांनी क्षेत्र वाढले : शेतकरी ज्वारी लागवडीकडे वळला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. रबी हंगामात यंदा हरभरा पिकाची लागवड ४४ हजार १०० हेक्टरवर होणार असून त्याच्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र १६ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर राहणार असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पाऊस अनियमित स्वरूपात झाला. तसेच दिवाळीच्या सुरूवातीला अचानक झालेल्या पावसाने सोयाबीन व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जिल्ह्यातील अनेक धरणे अत्यल्प पावसामुळे भरली नाहीत. अशा परिस्थितीतही शेतकºयांनी रबी पिकाच्या पेरणीसाठी कंबर कसली आहे. यंदा ६६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर रबी पिके घेतली जाणार आहेत. त्यात ज्वारी ८२५ हेक्टर, गहू १६ हजार २५० हेक्टर, हरभरा ४४ हजार १०० हेक्टर, करडई १०० हेक्टर, तीळ १०० हेक्टर, मोहरी २०० हेक्टर, सूर्यफुल १५०, जवस ५० हेक्टर, मका ५०० व उन्हाळी भूईमुंगाची लागवड ४ हजार हेक्टरवर होणार असल्याचे सांगण्यात आले. गत वर्षी ८० हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक भागात रबी पिकासाठी धरणाचे पाणी सोडले जाण्याची शक्यता नसल्याने रबीचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने घसरले आहे. इतकेच नव्हे तर भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे खरीप पिकाच्या मशागतीच्या कामातही अडचण येत आहे. गव्हासाठी तयार करण्यात येत असलेल्या कठाणाला पाणी देणे भारनियमनामुळे अडचणीचे जात आहे. शेतकºयाला मध्यरात्री जाऊन पाणी ओलण्याची वेळ आली आहे.यावर्षी सेलू तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ३७० हेक्टरवर रबी पीक घेतली जाणार आहेत. समुद्रपूर तालुक्यात ११ हजार १२२ हेक्टरवर,वर्धा तालुक्यात ९१३५, आष्टी तालुक्यात ८९३०, देवळी ७०२५, आर्वी तालुक्यात ५१५५, हिंगणघाट तालुक्यात ६६४५, कारंजा तालुक्यात ६८९३ हेक्टर क्षेत्रावर रबी पीक घेण्यात येणार आहेत.